शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

सर्वार्थाने भाग्योदयासाठी गुरुचरित्रातील 'हा' तोडगा ठरू शकतो प्रभावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 16:05 IST

गुरुचरित्र वाचताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. म्हणून पुढील तोडगा त्या तुलनेत सोपा आहे, त्याचा अनुभव घ्यावा.

असंख्य प्रयत्न करूनही यश मिळत नसेल किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर लेखक अ.ल.भागवत यांनी `परम सुखाचे रहस्य' या पुस्तकात दिलेला प्रभावी तोडगा जरूर आजमावून बघा.

गुरुचरित्राचे सामर्थ्य अनेक भाविकांनी अनुभवले आहे. गुरुचरित्राचे भक्तिभावाने पारायण करणाऱ्या लोकांच्या अडचणी दूर झाल्याचेही आपण ऐकले असेल. परंतु गुरुभक्ती सोपी नाही. गुरुचरित्र वाचताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. म्हणून पुढील तोडगा त्या तुलनेत सोपा आहे, त्याचा अनुभव घ्यावा.

सर्व रीतींनी भाग्योदय होण्यासाठी भाविकांनी पुढील तोडगा अवश्य करावा. 

हा तोडगा एखाद्या गुरुवारपासून सुरू करावा. रोज सकाळी स्नान करून गुरुचरित्राची अवतर्णिका बावन्न दिवस वाचावी. सात आठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. अवतर्णिका मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने वाचावी. या बावन्न दिवसांत कांदा व लसूण खाऊ नये. शक्य तो हॉटेलमधील पदार्थ खाऊ नयेत. खाणावळीतही जेवू नये. या काळात आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. कोणावर रागवू नये. जागरणे करू नयेत. कामोत्तेजक सिनेमे पाहू नये, कादंबऱ्या वाचू नये. 

रोज रात्री झोपण्याआधी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र १०८ वेळा जपावा. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपला भाग्योदय होईल असा भाव ठेवावा. बावन्नाव्या दिवशी जेवणात काही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. 

या बावन्न दिवसात येणाऱ्या गुरुवारी उपवास करावा. वरीलप्रमाणे तोडगा श्रद्धेने व भक्तिभावाने केल्यास भाग्योदय होण्यास वेळ लागणार नाही. आकस्मिक संकट आलेल्या व्यक्तींनी हा तोडगा अवश्य करून बघावा. त्यांना मोठी हिंमत येईल व शेवटी संकट निवारण होईल. आजारी माणसांसाठी हा तोडगा दुसऱ्यांनी करावा.