शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

दहा वर्षांनी दोनच शब्द बोलायची संधी मिळाली, तर तुम्ही कोणते शब्द बोलाल? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:21 IST

दोष बघत राहाल तर दोषच दिसतील, आनंद शोधायचा ठरवला तर आनंदच मिळेल!

आपल्या सर्वांना एक वाईट खोड असते, ती म्हणजे सतत दुसऱ्यांमधले दोष शोधण्याची. ते म्हणतात ना, दुसऱ्यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! त्यामुळे आपल्याला सगळीकडे फक्त वाईटच घडतेय की काय असा समज निर्माण होतो. याउलट, आपण जर चांगल्या गोष्टी बघायला शिकलो तर आपल्याला हे जग देखील चांगलेच दिसू लागेल. त्यासाठी ही छोटीशी गोष्ट नक्की वाचा. 

एका आश्रमात गुरुकुल पद्धतीप्रमाणे शेकडो विद्यार्थी राहत होते. त्या गुरुकुलचा नियम होता, की तिथे कोणालाही बोलायची मुभा नव्हती. सर्वांनी मौन पाळायचे. ज्या विद्यार्थ्याची अध्ययनाची दहा वर्षे पूर्ण होत त्याला दोन शब्द बोलण्याची मुभा मिळत असे. त्यानुसार एका विद्यार्थ्याची दहा वर्षे पूर्ण झाली. गुरूंनी त्याला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. तो म्हणाला 'अन्न वाईट' गुरुजींनी मान डोलावली. त्यानंतर दहा वर्षे गेली. त्याला पुन्हा बोलण्याची संधी मिळाली. यावेळेस तो म्हणाला, 'अंथरूण वाईट'. आणखी दहा वर्षांनी त्याला बोलायची संधी मिळाली तेव्हा म्हणाला 'जमणार नाही' गुरुजी हसले आणि त्यांनी त्या शिष्याला गुरुकुल सोडून जाण्याची परवानगी दिली. 

या गोष्टीतला गमतीशीर मुद्दा हा की दहा वर्षांनी बोलायची संधी मिळून शिष्याने तक्रारीचा सूर लावला. त्या तक्रारीत पुढची दहा वर्षे घालवली आणि आणखी दहा वर्षांनी त्याने तिथली व्यवस्था चांगली नाही म्हणत आश्रम सोडून जाण्याची परवानगी मागितली. याऐवजी या विद्यार्थ्याने जर अन्न वाईट न म्हणता पाककला शिकून घेतली असती आणि सहकाऱ्यांना घेऊन न बोलता जेवणात बदल केले असते, तर त्याचा पहिला प्रश्न सुटला असता. अंथरुणाबद्दल तक्रार करण्यापेक्षा त्यावर उपाय शोधला असता तर सर्वांसाठी झोपेची चांगली व्यवस्था झाली असती. सतत तक्रार करत राहिल्यामुळे त्याला त्या आश्रमात शिकण्याची संधी असूनही त्याने आश्रम सोडला, कारण त्याला तिथे काहीच चांगले दिसले नाही. 

आपणही थोड्या फार प्रमाणात याच चुका करतो. परंतु या चुका वेळीच सुधारल्या, तर आपले आयुष्य आनंदाने बहरेलच पण कदाचित आपल्या प्रयत्नांनी इतरांच्याही आयुष्यात आनंद फुलेल.