शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दहा वर्षांनी दोनच शब्द बोलायची संधी मिळाली, तर तुम्ही कोणते शब्द बोलाल? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:21 IST

दोष बघत राहाल तर दोषच दिसतील, आनंद शोधायचा ठरवला तर आनंदच मिळेल!

आपल्या सर्वांना एक वाईट खोड असते, ती म्हणजे सतत दुसऱ्यांमधले दोष शोधण्याची. ते म्हणतात ना, दुसऱ्यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! त्यामुळे आपल्याला सगळीकडे फक्त वाईटच घडतेय की काय असा समज निर्माण होतो. याउलट, आपण जर चांगल्या गोष्टी बघायला शिकलो तर आपल्याला हे जग देखील चांगलेच दिसू लागेल. त्यासाठी ही छोटीशी गोष्ट नक्की वाचा. 

एका आश्रमात गुरुकुल पद्धतीप्रमाणे शेकडो विद्यार्थी राहत होते. त्या गुरुकुलचा नियम होता, की तिथे कोणालाही बोलायची मुभा नव्हती. सर्वांनी मौन पाळायचे. ज्या विद्यार्थ्याची अध्ययनाची दहा वर्षे पूर्ण होत त्याला दोन शब्द बोलण्याची मुभा मिळत असे. त्यानुसार एका विद्यार्थ्याची दहा वर्षे पूर्ण झाली. गुरूंनी त्याला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. तो म्हणाला 'अन्न वाईट' गुरुजींनी मान डोलावली. त्यानंतर दहा वर्षे गेली. त्याला पुन्हा बोलण्याची संधी मिळाली. यावेळेस तो म्हणाला, 'अंथरूण वाईट'. आणखी दहा वर्षांनी त्याला बोलायची संधी मिळाली तेव्हा म्हणाला 'जमणार नाही' गुरुजी हसले आणि त्यांनी त्या शिष्याला गुरुकुल सोडून जाण्याची परवानगी दिली. 

या गोष्टीतला गमतीशीर मुद्दा हा की दहा वर्षांनी बोलायची संधी मिळून शिष्याने तक्रारीचा सूर लावला. त्या तक्रारीत पुढची दहा वर्षे घालवली आणि आणखी दहा वर्षांनी त्याने तिथली व्यवस्था चांगली नाही म्हणत आश्रम सोडून जाण्याची परवानगी मागितली. याऐवजी या विद्यार्थ्याने जर अन्न वाईट न म्हणता पाककला शिकून घेतली असती आणि सहकाऱ्यांना घेऊन न बोलता जेवणात बदल केले असते, तर त्याचा पहिला प्रश्न सुटला असता. अंथरुणाबद्दल तक्रार करण्यापेक्षा त्यावर उपाय शोधला असता तर सर्वांसाठी झोपेची चांगली व्यवस्था झाली असती. सतत तक्रार करत राहिल्यामुळे त्याला त्या आश्रमात शिकण्याची संधी असूनही त्याने आश्रम सोडला, कारण त्याला तिथे काहीच चांगले दिसले नाही. 

आपणही थोड्या फार प्रमाणात याच चुका करतो. परंतु या चुका वेळीच सुधारल्या, तर आपले आयुष्य आनंदाने बहरेलच पण कदाचित आपल्या प्रयत्नांनी इतरांच्याही आयुष्यात आनंद फुलेल.