शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टवीरांची वैशिष्ट्ये वाचून तुम्ही म्हणाल, 'पुढचा जन्म ऑगस्टमध्येच हवा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 12:09 IST

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो.

ऑगस्टमध्ये जन्माला आलेले लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांना विशेषत: सूर्याचे बळ मिळते. कारण या महिन्याचा गुरु सूर्य हा ग्रह असतो. त्यामुळे साहजिकच सूर्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रात सतेज कामगिरी करतात. ते उच्च जीवनशैली जगतात व मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात. त्याचबरोबर त्यांच्या ठायी असलेल्या नम्रतेमुळे ते आई वडिलांची सेवा, गरीबांना दानधर्म आवर्जून करतात. त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकता हे दोन गुण असतात. ते दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वत:च्या आनंदाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदात जाते. ते प्रत्येक नाते इमानदारीने निभावतात.

या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो. ते कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. आपले ध्येय गाठताना ते सत्याची कास सोडू देत नाहीत. स्वत: प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. अशा लोकांना स्वत:ची स्तुती ऐकायला आवडते. गंमत म्हणजे, कोणी यांची स्तुती केली नाही, तर ते स्वत:च आपली स्तुती करून मोकळे होतात.

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो. सूर्याचे जसे तेज त्यांच्या कार्याला मिळते, त्याचप्रमाणे सूर्याचा उग्रपणा थोडाफार त्यांच्या स्वभावात उतरतो. त्यामुळे रागाच्या भरात उलटसुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात. मात्र, हे लोक हिंसा, अत्याचार, फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाहीत.    

या लोकांना निरोगी आयुष्याचे वरदान असते. मध्यम बांधा, साधारण उंची, व्यक्तीमत्त्व रुबाबदार पण विरळ केस असे त्यांच्या रंगरुपाचे गणित असते. परंतु, मुळातच उच्च राहणीमानाची आवड असल्याने हे लोक आपल्या नैगुण्यावर सहज मात करतात आणि आपल्याला आणखी चांगले कसे राहता येईल, जगता येईल याचा विचार करतात व तशी मेहनत घेतात.

कमी मेहनत आणि जास्त परिणाम हे व्यस्त गुणोत्तर या लोकांच्या बाबतीत लागू होते. म्हणून सुरुवातीलाच यांना भाग्यवान असे म्हटले आहे. एवढेच काय, तर या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकते. तसेच नेतृत्त्वाचे गुण असल्यामुळे ते भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद चांगले निभावू शकतात. परंतु कधी कधी ते अविचाराने चांगल्या संधीला हुकतात व पश्चात्ताप करत बसतात. अशा बाबतीत त्यांचा थोडा संशयी स्वभाव आड येतो. तसेच दुसऱ्यांचे मत विचारण्यात कमीपणा वाटतो. या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात़

या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्ने लाभदायक ठरतात. तर पिवळा, केशरी आणि हिरवा हे रंग शुभ ठरतात. या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे. त्याचा त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो. सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य नमस्कार घालणे, गायत्री मंत्र म्हणणे यासारखे उपाय त्यांनी जरूर करावेत.

मदर तेरेसा, किशोर कुमार, राजीव गांधी, निर्मला सितारामन, श्रीदेवी, एनआर नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, गुलजार अशी नामांकित मंडळी ऑगस्ट महिन्यात जन्माला आली.