शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ऑगस्टवीरांची वैशिष्ट्ये वाचून तुम्ही म्हणाल, 'पुढचा जन्म ऑगस्टमध्येच हवा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 12:09 IST

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो.

ऑगस्टमध्ये जन्माला आलेले लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांना विशेषत: सूर्याचे बळ मिळते. कारण या महिन्याचा गुरु सूर्य हा ग्रह असतो. त्यामुळे साहजिकच सूर्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रात सतेज कामगिरी करतात. ते उच्च जीवनशैली जगतात व मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात. त्याचबरोबर त्यांच्या ठायी असलेल्या नम्रतेमुळे ते आई वडिलांची सेवा, गरीबांना दानधर्म आवर्जून करतात. त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकता हे दोन गुण असतात. ते दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वत:च्या आनंदाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदात जाते. ते प्रत्येक नाते इमानदारीने निभावतात.

या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो. ते कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. आपले ध्येय गाठताना ते सत्याची कास सोडू देत नाहीत. स्वत: प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. अशा लोकांना स्वत:ची स्तुती ऐकायला आवडते. गंमत म्हणजे, कोणी यांची स्तुती केली नाही, तर ते स्वत:च आपली स्तुती करून मोकळे होतात.

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो. सूर्याचे जसे तेज त्यांच्या कार्याला मिळते, त्याचप्रमाणे सूर्याचा उग्रपणा थोडाफार त्यांच्या स्वभावात उतरतो. त्यामुळे रागाच्या भरात उलटसुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात. मात्र, हे लोक हिंसा, अत्याचार, फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाहीत.    

या लोकांना निरोगी आयुष्याचे वरदान असते. मध्यम बांधा, साधारण उंची, व्यक्तीमत्त्व रुबाबदार पण विरळ केस असे त्यांच्या रंगरुपाचे गणित असते. परंतु, मुळातच उच्च राहणीमानाची आवड असल्याने हे लोक आपल्या नैगुण्यावर सहज मात करतात आणि आपल्याला आणखी चांगले कसे राहता येईल, जगता येईल याचा विचार करतात व तशी मेहनत घेतात.

कमी मेहनत आणि जास्त परिणाम हे व्यस्त गुणोत्तर या लोकांच्या बाबतीत लागू होते. म्हणून सुरुवातीलाच यांना भाग्यवान असे म्हटले आहे. एवढेच काय, तर या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकते. तसेच नेतृत्त्वाचे गुण असल्यामुळे ते भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद चांगले निभावू शकतात. परंतु कधी कधी ते अविचाराने चांगल्या संधीला हुकतात व पश्चात्ताप करत बसतात. अशा बाबतीत त्यांचा थोडा संशयी स्वभाव आड येतो. तसेच दुसऱ्यांचे मत विचारण्यात कमीपणा वाटतो. या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात़

या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्ने लाभदायक ठरतात. तर पिवळा, केशरी आणि हिरवा हे रंग शुभ ठरतात. या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे. त्याचा त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो. सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य नमस्कार घालणे, गायत्री मंत्र म्हणणे यासारखे उपाय त्यांनी जरूर करावेत.

मदर तेरेसा, किशोर कुमार, राजीव गांधी, निर्मला सितारामन, श्रीदेवी, एनआर नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, गुलजार अशी नामांकित मंडळी ऑगस्ट महिन्यात जन्माला आली.