शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ऑगस्टवीरांची वैशिष्ट्ये वाचून तुम्ही म्हणाल, 'पुढचा जन्म ऑगस्टमध्येच हवा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 12:09 IST

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो.

ऑगस्टमध्ये जन्माला आलेले लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांना विशेषत: सूर्याचे बळ मिळते. कारण या महिन्याचा गुरु सूर्य हा ग्रह असतो. त्यामुळे साहजिकच सूर्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रात सतेज कामगिरी करतात. ते उच्च जीवनशैली जगतात व मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात. त्याचबरोबर त्यांच्या ठायी असलेल्या नम्रतेमुळे ते आई वडिलांची सेवा, गरीबांना दानधर्म आवर्जून करतात. त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकता हे दोन गुण असतात. ते दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वत:च्या आनंदाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदात जाते. ते प्रत्येक नाते इमानदारीने निभावतात.

या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो. ते कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. आपले ध्येय गाठताना ते सत्याची कास सोडू देत नाहीत. स्वत: प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. अशा लोकांना स्वत:ची स्तुती ऐकायला आवडते. गंमत म्हणजे, कोणी यांची स्तुती केली नाही, तर ते स्वत:च आपली स्तुती करून मोकळे होतात.

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो. सूर्याचे जसे तेज त्यांच्या कार्याला मिळते, त्याचप्रमाणे सूर्याचा उग्रपणा थोडाफार त्यांच्या स्वभावात उतरतो. त्यामुळे रागाच्या भरात उलटसुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात. मात्र, हे लोक हिंसा, अत्याचार, फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाहीत.    

या लोकांना निरोगी आयुष्याचे वरदान असते. मध्यम बांधा, साधारण उंची, व्यक्तीमत्त्व रुबाबदार पण विरळ केस असे त्यांच्या रंगरुपाचे गणित असते. परंतु, मुळातच उच्च राहणीमानाची आवड असल्याने हे लोक आपल्या नैगुण्यावर सहज मात करतात आणि आपल्याला आणखी चांगले कसे राहता येईल, जगता येईल याचा विचार करतात व तशी मेहनत घेतात.

कमी मेहनत आणि जास्त परिणाम हे व्यस्त गुणोत्तर या लोकांच्या बाबतीत लागू होते. म्हणून सुरुवातीलाच यांना भाग्यवान असे म्हटले आहे. एवढेच काय, तर या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकते. तसेच नेतृत्त्वाचे गुण असल्यामुळे ते भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद चांगले निभावू शकतात. परंतु कधी कधी ते अविचाराने चांगल्या संधीला हुकतात व पश्चात्ताप करत बसतात. अशा बाबतीत त्यांचा थोडा संशयी स्वभाव आड येतो. तसेच दुसऱ्यांचे मत विचारण्यात कमीपणा वाटतो. या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात़

या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्ने लाभदायक ठरतात. तर पिवळा, केशरी आणि हिरवा हे रंग शुभ ठरतात. या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे. त्याचा त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो. सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य नमस्कार घालणे, गायत्री मंत्र म्हणणे यासारखे उपाय त्यांनी जरूर करावेत.

मदर तेरेसा, किशोर कुमार, राजीव गांधी, निर्मला सितारामन, श्रीदेवी, एनआर नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, गुलजार अशी नामांकित मंडळी ऑगस्ट महिन्यात जन्माला आली.