शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

धागा धागा अखंड विणूया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 03:58 IST

मानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात.

- इंद्रजित देशमुखमानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात. त्याप्रमाणे मानव्याच्या जोपासनेसाठी एकत्र येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाने आपापला वैयक्तिक अभिनिवेशटाकून सगळ्यांच्यात मिसळलं पाहिजे तरच मानव्याची जोपासना होऊ शकते. याच माणसाला माणूस जोडण्याच्या प्रक्रियेला अनुबोधून कविवर्य पी. सावळाराम म्हणतात,‘धागा धागा अखंड विणूया।विठ्ठल विठ्ठ मुखे म्हणूया।।’मुळात सगळ्यांच्यात आपलेपणा पाहून त्या आपलेपणास अनुसरून असलेलं आंतरिक स्नेह आपल्याकडून सहज व्यक्तव्हायला लागलं की समाजात एकात्मता नांदू लागते. आपल्या भोवतालच्या निसर्गातील विविधरंगी वसुंधरेच्या अंगावरील हे जे अक्षांशाचे आणि रेखांशाचे उभे आणि आडवे विणलेले आवरण आहे. ते विणताना त्या निर्मात्याने सगळ्या प्रभावी आणि अभावी गुणधर्माच्या घटकांना एका संगतीत आणले आहे. आम्ही आमच्या जगण्यात आपले हात आणि पाय यांच्या सकारात्मक कृतीने सगळ्यांची मनं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या एकत्र येण्याने समाजात जे अर्धवट सुरक्षित आहे त्याची पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, आपल्यातील कुणी मागे असल्याचं शल्य मनात धरून त्याला आपल्या बरोबरीने चालण्याची ताकद आणि उत्तेजना दिली पाहिजे. सुखाची आणि आनंदाची अनुभूती सहजीवी स्वरूपात सगळ्यांनी एकत्र मिळून घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला बंधुत्वाचा चरखा फिरवून एकत्वाचे सूत्र विणण्याचा प्रयत्न करून आपण एक बनूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक