शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

धागा धागा अखंड विणूया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 03:58 IST

मानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात.

- इंद्रजित देशमुखमानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात. त्याप्रमाणे मानव्याच्या जोपासनेसाठी एकत्र येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाने आपापला वैयक्तिक अभिनिवेशटाकून सगळ्यांच्यात मिसळलं पाहिजे तरच मानव्याची जोपासना होऊ शकते. याच माणसाला माणूस जोडण्याच्या प्रक्रियेला अनुबोधून कविवर्य पी. सावळाराम म्हणतात,‘धागा धागा अखंड विणूया।विठ्ठल विठ्ठ मुखे म्हणूया।।’मुळात सगळ्यांच्यात आपलेपणा पाहून त्या आपलेपणास अनुसरून असलेलं आंतरिक स्नेह आपल्याकडून सहज व्यक्तव्हायला लागलं की समाजात एकात्मता नांदू लागते. आपल्या भोवतालच्या निसर्गातील विविधरंगी वसुंधरेच्या अंगावरील हे जे अक्षांशाचे आणि रेखांशाचे उभे आणि आडवे विणलेले आवरण आहे. ते विणताना त्या निर्मात्याने सगळ्या प्रभावी आणि अभावी गुणधर्माच्या घटकांना एका संगतीत आणले आहे. आम्ही आमच्या जगण्यात आपले हात आणि पाय यांच्या सकारात्मक कृतीने सगळ्यांची मनं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या एकत्र येण्याने समाजात जे अर्धवट सुरक्षित आहे त्याची पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, आपल्यातील कुणी मागे असल्याचं शल्य मनात धरून त्याला आपल्या बरोबरीने चालण्याची ताकद आणि उत्तेजना दिली पाहिजे. सुखाची आणि आनंदाची अनुभूती सहजीवी स्वरूपात सगळ्यांनी एकत्र मिळून घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला बंधुत्वाचा चरखा फिरवून एकत्वाचे सूत्र विणण्याचा प्रयत्न करून आपण एक बनूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक