शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

गरुड पुराणानुसार 'या' लोकांसाठी स्वर्गाचे दार खुले होते; तुम्हीसुद्धा दिलेले नियम अवश्य पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 13:39 IST

गरुड पुराणात मनुष्य जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. भगवान विष्णू आणि पक्षी राजा गरुड यांच्यातील चर्चेचा गरुड पुराणात समावेश करण्यात आला आहे.

धर्म पुराणात चांगल्या आणि वाईट कर्मांचे तपशीलवार वर्णन केले आहे. यासोबतच कर्माच्या आधारावर स्वर्ग आणि नरकही सांगितले आहे. जे वाईट कर्म करतात त्यांना नरक मिळतो. त्याचप्रमाणे सत्कर्म करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्त होतो. तसेच सत्कर्माला सदाचरण आणि अध्यात्माची जोड जे देतात त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजेच मोक्ष मिळतो. गरुड पुराणात ही तिन्ही ठिकाणे सांगितली आहेत आणि त्यांच्यासाठी कर्मांचे वर्णनही केले आहे. नरकात जावे असे कोणालाही वाटणार नाही आणि मोक्षाचे द्वार सर्वसामान्यांनासाठी तसे अवघडच! म्हणून आपल्यासाठी निदान स्वर्गाचे द्वार उघडते का पाहू आणि त्यासाठी कोणते सत्कर्म पदरात लागते तेही जाणून घेऊ!

गरुड पुराणात मनुष्य जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. भगवान विष्णू आणि पक्षी राजा गरुड यांच्यातील चर्चेचा गरुड पुराणात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भगवान विष्णू सांगतात की ज्या आत्म्यांना स्वर्गात स्थान मिळते, त्यांना यमराज स्वत: स्वर्गाच्या दारात सोडण्यासाठी येतात. तेथे अप्सरा दारात त्यांचे स्वागत करतात. मृत्यूनंतर, असा आनंद फक्त त्या लोकांनाच मिळतो जे आपल्या आयुष्यात खूप चांगले कार्य करतात. 

>>जे इतरांना जलदान करतात. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे यासारखे महापुण्य नाही. गरुड पुराणातही तेच म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात, त्यांना स्वर्गात स्थान मिळते. जसे की विहिरी, तळी, हंडे भरून ठेवणे. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे लोकही स्वर्गात जातात.

>>जे लोक नेहमी स्त्रियांचा आदर करतात आणि त्यांच्या उद्धारासाठी काम करतात, त्यांना स्वर्गातही स्थान मिळते.

>>जे आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि त्यातील काही भाग गरिबांच्या मदतीसाठी वापरतात, ते सुद्धा खूप पुण्यवान असतात. त्यांनाही स्वर्गात स्थान मिळते.

>>ऋषी-मुनींचा, साधू संत सज्जनांचा आदर करणारे लोक. ते त्यांच्यासाठी जेवण आणि इतर सुविधांची व्यवस्था करतात, त्यांची सेवा करतात. वेद आणि पुराणांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना शिधा देतात, यथाशक्ती आर्थिक मदत करतात त्यांनाही स्वर्ग मिळतो. 

>>जे आयुष्यभर चांगले कर्म करतात आणि कोणताही आजार न होता मरतात ते देखील स्वर्गास पात्र ठरतात.