शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

या वाघाच्या जबड्यात हात घालताच मिळायचा सोने नाण्यांसह भरपूर खजिना; पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 07:00 IST

सोन्याच्या राशी देणारी अशीच एखादी व्याघ्रमूर्ती तुम्हालाही सापडली तर? त्यासाठी वाचा ही गोष्ट!

एक गरीब माणूस लाकुडतोडीचा व्यवसाय करून तुटपुंज्या मिळकतीवर गुजराण करत होता. त्याचे घर त्याच्यावर अवलंबून होते. त्याने कधी देवाकडे आपल्या परिस्थितीबद्दल तक्रार केली नाही. तो प्रामाणिकपणे आपले नित्यकर्म करत होता. लाकुडतोडीसाठी त्याला कधी जंगलात तर कधी डोंगरावर जावे लागे. असेच एकदा तो न्याहारी घेऊन आपल्या कामासाठी डोंगरावर गेला. दुपारी काम थांबवून तो एका झाडाच्या छायेत जेवायला बसणार, तोच त्याचे लक्ष एका दगडाकडे गेले. त्या दगडात वाघाचे शिल्प असल्याचे त्याला आढळले. असा चमत्कारिक योग जुळून आल्याने त्याने आपल्याजवळ असलेल्या अन्नाचा एक घास त्या व्याघ्रमूर्तीच्या तोंडी ठेवला. न्याहारी संपवली आणि उलेलेले काम पूर्ण करून तो घरी गेला.

आता त्या डोंगरावर त्याचे येणेजाणे रोजचेच झाले आणि आपण जेवणाआधी व्याघ्रमूर्तीला घास भरवणेही सरावाचे झाले. एक दिवस त्या मूर्तीतून आवाज आला. 'मित्रा, तुझे खूप आभार. तू मला रोज जेवू घातलेस. मी साधीसुधी मूर्ती नाही. माझ्या पोटात सोने दडले आहे. मी तुझ्या निष्काम सेवेवर प्रसन्न झालो आहे, म्हणून मी तुला ते देऊ इच्छितो.'

लाकुडतोड्या भावुक होऊन म्हणाला, 'मित्रा म्हणतोस आणि व्यवहार करतोस? अरे मलाही या जंगलात, एकांतात दुसरा कोणी सोबती नाही म्हणून तुला मित्र मानले आणि जेवू घातले. माझ्याजवळ जे आहे त्यात मी समाधानी आहे.'

व्याघ्रमूर्तीने सांगितले, `तू स्वत:साठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी काहीतरी घेऊन जावेस अशी माझी इच्छा आहे. म्हणून उद्या सूर्योदयापूर्वी तू ये, माझ्या तोंडात हात घाल आणि हवे तेवढे सोने घेऊन जा. मात्र सूर्योदय झाला की माझे तोंड मिटते. त्यामुळे तू अडवूâन राहण्याआधी मी सांगतो तसे कर.'

लाकुडतोड्या घरी आला. बायकोला हकीकत सांगितली. ती विचारात पडली. प्रयोग करून बघा म्हणाली. दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्या वेळेत पोहोचला. त्याने एकावेळेस जेवढे सोने हाताला लागले तेवढे घेतले आणि हात बाहेर काढला आणि व्याघ्रमूर्तीला नमस्कार केला आणि तो घरी गेला. 

रातोरात लाकुडतोड्या श्रीमंत झालेला पाहून त्याच्या गावातला श्रीमंत व्यापारी लाकुडतोड्याला गुपित विचारू लागला. त्याने बिचाऱ्याने सगळे काही सांगून टाकले. लोभी व्यापारी विचार करू लागला, `मलाही सोने मिळाले तर मी आणखी श्रीमंत होईन.' 

या लोभापायी त्याने गरीब लाकुडतोड्याचे सोंग घेतले आणि व्याघ्रमूर्तीशी मैत्री केली. व्याघ्रमूर्तीने त्यालाही एक संधी दिली. व्यापारी सूर्योदयाआधी पोहोचला आणि त्याने वाघाच्या तोंडात हात घातला आणि तो एकामागे एक सोने काढत राहिला. तसे करताना सूर्योदयाची वेळ आली हे त्याच्या लक्षातही आले नाही. अटीप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी व्याघ्रमूर्तीचे तोंड बंद झाले आणि व्यापाऱ्याचा हात कायमचा त्यात अडकला.

पायाशी सोन्याच्या राशी पडूनही व्यापाऱ्याला ते सोने उपभोगता आले नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराजदेखील सांगतात, 'जोडानिया धन उत्तम व्यवहारे!'