शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सद्यस्थितीची थेट रामायणाशी नाळ जोडणारी सुंदर आणि वास्तवदर्शी कथा; नक्की वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:48 IST

कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये हे महाभारतातून शिकावे. या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यांची उकल, हे ग्रंथ वाचल्याशिवाय होणार नाही.

एक आजोबा ट्रेन प्रवासासाठी गाडीच्या प्रतिक्षेत फलाटावर बसले होते. त्यांच्याजागी कोणी युवक असता, तर त्याने वेळ घालवण्यासाठी तत्काळ मोबाईल हाती घेतला असता आणि हेडफोन कानात अडकवले असते. परंतु, आजोबा जुन्या विचारांचे आणि जुन्या काळातले. वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी ग्रंथवाचन करायला सुरुवात केली. गाडी यायला अजून बराच वेळ बाकी होता.

थोड्या वेळाने एक तरुण जोडपे त्याच ट्रेनने प्रवास करण्यासाठी फलाटावर पोहोचते. ट्रेनच्या वेळेआधी पोहोचल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर होते. ट्रेन यायला आणखी अर्धा तास बाकी होता. म्हणून दोघे जण बसायला कुठे जागा मिळते का, हे पाहू लागले. तरुणाची नजर आजोबा बसलेल्या बाकावर गेली. तिथे आणखी दोन जागा शिल्लक होत्या. दोघे जण सामान उचलून आजोबांच्या दिशेने गेले. ते येताच आजोबांनी बाजूला ठेवलेली बॅग उचलून पायाशी ठेवली आणि त्यांना बसायला जागा दिली. दोघांकडे बघून स्मित करत आजोबा वाचनात मग्न झाले.

बायको फोनवर बोलण्यात मग्न असताना तरुणाने आजोबांच्या ग्रंथात मान डोकावली. आपला आगाऊपणा व्यक्त करत तो आजोबांना म्हणाला, `काय आजोबा? टीव्हीवर इतक्यांदा रामायण दाखवून झाले. तरी तुम्ही काय अजून त्या ग्रंथांमध्ये अडकून राहिलात? त्यापेक्षा मोबाईलवर खूप छान आधुनिक ग्रंथ उपलब्ध आहेत. ते वाचा. म्हणजे नवीन जगाशी तुम्ही जोडले जाल.' आजोबांनी नुसते हसून एकतर्फी संवाद तिथेच संपवला.

काही वेळातच ट्रेनची घोषणा झाली. ट्रेन त्या स्टेशनवर फार काळ थांबणार नव्हती. ट्रेन थांबताच गर्दी झाली. सगळेच जण चढण्यासाठी घाई करू लागले. आजोबा मागच्या दाराने चढले. पाठोपाठ इतर प्रवासीही चढले. आजोबांच्या बाजूला बसलेला तरुण पुढच्या दाराने डब्यात शिरला. ट्रेन काही क्षणात सुरू झाली आणि फलाट संपायच्या आत थांबली. आजोबांनी विचारले, `काय झाले? ट्रेन का थांबली?' कोणीतरी सांगितले, `एका प्रवाशाची बायको आत चढायची राहून गेली म्हणून त्याने चैन ओढली.'

खिडकीतून डोकावून पाहिले, तर मगाशी बाजूला बसलेल्या तरुणाची बायको मागे राहिली होती. ते दोघे चढले. ट्रेन सुरू झाली. सगळे जण आपापल्या जागी बसल्यावर आजोबा त्या तरुणाजवळ गेले आणि म्हणाले, 'बेटा आता मी सांगतो, तू ऐक! तू म्हणत होतास ना, रामायणातून काय मिळणार आहे? तर बेटा, आपल्याआधी कुटुंबाची काळजी घेणे, ही छोट्यात छोटी गोष्टसुद्धा रामायणातून शिकायला मिळते. वनवासाला निघताना रथात चढण्यापूर्वी राम सीतेला आधी चढवतात. दंडकारण्यात जाताना नौकाप्रवासातही सीतेला नावेत आधी बसवतात. मग स्वत: बसतात. एवढेच काय, तर सुवर्णमृगाच्या शोधात निघतानाही ते लक्ष्मणावर सीतेची जबाबदारी सोपवून मगच बाहेर गेले. श्रीरामप्रभू जर एवढी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवू शकतात, तर आपणही त्यातून हे शिकायला नको का? प्रवासाला जाताना आधी बायको, मुलांची काळजी घ्यायची की आपणच पुढे स्वार व्हायचे? तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल बहुतेक! तरी एक गोष्ट लक्षात ठेव. रामायण, महाभारत धर्मग्रंथ कितीही वेळा वाचले, तरी त्यातून दरवेळी नवीन गोष्टीच शिकायला मिळतात. कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये हे महाभारतातून शिकावे. या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यांची उकल, हे ग्रंथ वाचल्याशिवाय होणार नाही. म्हणून त्यांना कमी लेखू नकोस आणि जमल्यास कधीतरी सवडीने नक्की वाच, म्हणजे पुन्हा अशा चूका होणार नाहीत. जय श्रीराम...!'