शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचा स्वनिधी सत्ताधाऱ्यांनीच खर्च केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून मिळालेला निधी इतर सदस्यांना विचारात न घेता सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे खर्च केल्यावरून सोमवारी जिल्हा ...

बीड : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून मिळालेला निधी इतर सदस्यांना विचारात न घेता सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे खर्च केल्यावरून सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित अनेक सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर या बैठकीत जिल्ह्यात पाणी टंचाई नसताना पाणी पुरवठा विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामांवर आक्षेप घेत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचा विषय चर्चेला आला. जवळपास सहा कोटींचा हा निधी आहे. इतर सदस्यांना विचारात न घेता तसेच सर्वसमावेशक विचार न करता सत्ताधाऱ्यांनी खर्च केल्याचा मुद्दा अशोक लोढा, योगिनी थोरात, भारत काळे, प्रकाश कवठेकर, युवराज डोंगरे आदींनी उपस्थित केला. स्वनिधीतून केलेल्या कामांचा आढावा सादर करण्याची मागणी यावेळी झाली. विभागप्रमुखांनी याबाबत अहवाल दिला नाही, तसेच अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सदस्यांनी सांगितले. २०२०-२१ मध्ये झेडपीआर कामे करताना विश्वासात घेतले नसल्याचा ठराव या सदस्यांनी मांडला. तसेच या कामांची देयके अदा करू नये, अशी सूचना केली.

या बैठकीत ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वसुली चांगली असताना ग्रामीण जनतेला सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याची तक्रार अधीक्षक अभियंत्यांकडे करण्यात आली. यावर सुधारणा करण्यात येईल असे सांगण्यात आले.

यावेळी अध्यक्ष शिवकन्या सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, सभापती सिता मस्के, कल्याण आबुज तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी धिकारी प्रमोद काळे, प्रदीप काकडे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

पाण्याच्या नावावर पाण्यासारखा खर्च

जिल्ह्यात पाणी टंचाई नसल्याचा भूवैज्ञानिकांचा अहवाल असताना व टंचाई आराखड्यात नसताना वारेमाप उधळपट्टी होत असल्याचा आरोप करण्यात आला. राज्य, जिल्हा, देखभाल, १४ वा वित्त आयोग अशा वेवेगळ्या निधीतून परत परत त्याच कामावर खर्च होत असल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. सर्वेक्षणानुसार ज्या गावांत कामे अपेक्षित आहेत, त्याऐवजी आराखड्यात नसलेल्या गावांचा समावेश करून मूळ आराखड्यात बदल केला जात असल्याचे सदस्य अशोक लोढा यांनी सांगितले. या संदर्भात काळजी घेतली जाईल. तपासणी करूनच प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याचे मुख्य कर्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.