शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सामाजिक उत्तरदायित्वासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : नमिता मुंदडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

अंबेजोगाई : येथील कृषी महाविद्यालय, अंबेजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे ...

अंबेजोगाई : येथील कृषी महाविद्यालय, अंबेजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी वनामकृविचेचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर उद्घाटक म्हणून आ नमिता मुंदडा या होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी कुलसचिव डाॅ. दिगंबरराव चव्हाण, उषा ढवण, माजी सरपंच वसंतराव मोरे, वैजनाथ देशमुख, सुदाम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची उपस्थिती होती.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या की, जागतिक पर्यावरणाची योग्य काळजी घेण्याचे सामर्थ्य हे कृषीच्या विद्यार्थ्यांत आहे. कृषी अभ्यासक्रमाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. आपल्या ज्ञानाचा वापर करून तसेच सामाजिक जाणिवेतून कृषी युवकांनी सामाजिक उत्तरदायित्व जोपासावे, असेही त्या म्हणाल्या. कृषी महाविद्यालयास सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी व्यासंगी आणि अभ्यासू असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ते साध्य करण्यासाठी त्या दिशेने योग्य ती पावले टाकली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचे जतन करावे, कृषीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आकांक्षाची क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी अविरत ग्रंथ वाचन करावे, असे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा सादर केला. तसेच स्वच्छ, सुंदर व हरित परिसर संकल्पनेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमात संभाजी हनुमंत गवळी, सूरज श्रीराम पोकळे, गणेश मधुकर कराड, पवन रामराव ठोंबरे, अनिल देवीदास पवार, भागवत बबन जायभाये, प्रियंका शिवाजी नखाते, भक्ती विजय पवार, सोनाली शिवाजी जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून गौरव करण्यात आला. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी कोरोना काळात समाजातील गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश रेवले यांनी तसेच गुणगौरव सोहळ्याचे संचालन सहायक प्रा.डाॅ. नरेशकुमार जायेवार यांनी तर उपस्थितांचे आभार सहयोगी प्राध्यापक डाॅ. दीपक लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ. अरुण कदम, डाॅ. प्रताप नाळवंडीकर, डाॅ. बसवलिंगआप्पा कलालबंडी, प्रा. सुनील गलांडे, डॉ. सुहास जाधव, डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. विद्या तायडे, डाॅ. योगेश वाघमारे, अनंत मुंढे, सुनील गिरी यांनी परिश्रम घेतले.