शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

सामाजिक उत्तरदायित्वासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : नमिता मुंदडा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन ...

अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, तर उद्घाटक म्हणून आमदार नमिता मुंदडा उपस्थित होत्या.

यावेळी व्यासपीठावर माजी कुलसचिव डाॅ. दिगंबरराव चव्हाण, उषा ढवण, माजी सरपंच वसंतराव मोरे, वैजनाथ देशमुख, सुदाम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते.

यावेळी उद्घाटक म्हणून आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, जागतिक पर्यावरणाची योग्य काळजी घेण्याचे सामर्थ्य हे कृषीच्या विद्यार्थ्यांत आहे. कृषी अभ्यासक्रमाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. आपल्या ज्ञानाचा वापर करून तसेच सामाजिक जाणिवेतून कृषी युवकांनी सामाजिक उत्तरदायित्व जोपासावे, असेही त्या म्हणाल्या. कृषी महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी व्यासंगी आणि अभ्यासू असले पाहिजे. मोठी स्वप्ने पाहून ते साध्य करण्यासाठी त्या दिशेने योग्य ती पावले टाकली पाहिजेत. वाचन संस्कृतीचे जतन करावे, कृषीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आकांक्षांची क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी अविरत ग्रंथ वाचन करावे, असे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा सादर केला तसेच स्वच्छ, सुंदर व हरित परिसर संकल्पनेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात संभाजी हनुमंत गवळी, सूरज श्रीराम पोकळे, गणेश मधुकर कराड, पवन रामराव ठोंबरे, अनिल देवीदास पवार, भागवत बबन जायभाये, प्रियंका शिवाजी नखाते, भक्ती विजय पवार, सोनाली शिवाजी जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून गौरव करण्यात आला. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी कोरोनाकाळात समाजातील गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन राजेश रेवले यांनी तसेच गुणगौरव सोहळ्याचे संचालन सहायक प्रा. डाॅ. नरेशकुमार जायेवार यांनी, तर उपस्थितांचे आभार सहयोगी प्राध्यापक डाॅ. दीपक लोखंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. अरुण कदम, डाॅ. प्रताप नाळवंडीकर, डाॅ. बसवलिंगआप्पा कलालबंडी, प्रा. सुनील गलांडे, डॉ. सुहास जाधव, डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. विद्या तायडे, डाॅ. योगेश वाघमारे, अनंत मुंढे, सुनील गिरी यांनी परिश्रम घेतले.