शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात नेतृत्व तयार केले - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात नेतृत्व तयार केल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. उल्हास उढाण ...

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात नेतृत्व तयार केल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. उल्हास उढाण यांनी केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद,संचलित येथील यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,विभागीय केंद्र,औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने 'आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान' या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे या होत्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,विभागीय केंद्र,औरंगाबादचे शैक्षणिक सल्लागार डाॅ.राम माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.राम माने यांनी केले. यावेळी डॉ.उल्हास उढाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की,यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील लोकांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून दिली. तसेच समाजातील सर्व स्तरांतील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळीला चालना देऊन महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविली. त्यांनी सतत गरीब जनतेचाच विचार केला. प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे म्हणाल्या की,यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. राजकारणाबरोबरच त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ.अनंत दादाराव मरकाळे यांनी केले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे,उपप्राचार्य प्रा.पी.के.जाधव, डॉ.डी.आर.तांदळे, डाॅ.डी.बी.तांदुळजेकर आदी प्राध्यापक,विद्यार्थी तसेच राज्य व राज्याच्या बाहेरील अभ्यासक सहभागी झाले होते.

===Photopath===

150321\15bed_7_15032021_14.jpg

===Caption===

अंबाजोगाईत यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते.