शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

कडा : निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, यामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येणार ...

कडा : निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, यामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येणार आहे.

पावसाळ्यात कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणणारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यासाठी संजीवनी देणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने १५ वर्षांपूर्वी घेतला होता, पण राजकारणापायी व राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम प्रगतपथावर सुरू असून, डिसेंबर २०२२ पर्यंत योजना पूर्ण होणार असून तीन वर्षांत आष्टीकरांना हे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे तालुक्यातील २७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती माजी आ. भीमराव धोंडे यांनी दिली.

आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावात पश्चिम महाराष्ट्रातून एक टिएमसी पाणी येणार असून, या योजनेचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. बारामती तालुक्यातील निरा नदीवरील बोगद्याच्या ठिकाणी स्वत: श्री. धोंडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.

कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवर ओढवलेले महासंकट संपूर्ण देशाने पाहिले आहे. या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. शेकडो टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या निरा-भीमा जोडप्रकल्प योजनेतून एक टिएमसी पाणी आष्टी तालुक्याला मिळणार. या योजनेतील कायदेशीर अडखळे आता दुर झाले असल्याने या योजनेचे काम सुरू असून, २४ कि.मी.चा असलेल्या बोगद्याचे काम १४.५० किमी झाले असून,जवळपास ६५ काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २२पर्यंत ही योजना पूर्ण होणार असल्याची माहिती गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ श्रेणी-१ अधिकारी राहुल घनवट यांनी दिली. या योजनेचे काम पूर्णक्षमतेने २४ तास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दर वर्षी पावसाळ्यात कृष्णेतील अतिरिक्त पाणी ११५ टीएमसी कर्नाटकात वाहून जाते. हे पाणी अडवून भीमा खोऱ्यात वळविल्यास दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. (यंदाच्या महापुरात कृष्णेतील सुमारे ७०० टीएमसी पाणी वाहून गेले आहे.) २००४ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत सुमारे पाच हजार कोटींची होती. सन २००४ लाच आमदार सुरेश धस यांनी आष्टी

तालुक्याला १ टिएममसी पाणी मिळावे म्हणून राज्य मंञीमंडळात मागणी करत चारशे कोटी रुपयांचा खुंटेफळ साठवण तलाव मंजूर करून घेतला. निरा-भीमा नदीजोड प्रकल्पासाठी आजमितीला खर्च सुमारे साडेसात हजार कोटींच्या घरात जातो, असेही माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.