शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

कडा : निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, यामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येणार ...

कडा : निरा-भीमा जोडप्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, यामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येणार आहे.

पावसाळ्यात कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणणारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यासाठी संजीवनी देणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने १५ वर्षांपूर्वी घेतला होता, पण राजकारणापायी व राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम प्रगतपथावर सुरू असून, डिसेंबर २०२२ पर्यंत योजना पूर्ण होणार असून तीन वर्षांत आष्टीकरांना हे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे तालुक्यातील २७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती माजी आ. भीमराव धोंडे यांनी दिली.

आष्टी तालुक्यात खुंटेफळ साठवण तलावात पश्चिम महाराष्ट्रातून एक टिएमसी पाणी येणार असून, या योजनेचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. बारामती तालुक्यातील निरा नदीवरील बोगद्याच्या ठिकाणी स्वत: श्री. धोंडे यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.

कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवर ओढवलेले महासंकट संपूर्ण देशाने पाहिले आहे. या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. शेकडो टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या निरा-भीमा जोडप्रकल्प योजनेतून एक टिएमसी पाणी आष्टी तालुक्याला मिळणार. या योजनेतील कायदेशीर अडखळे आता दुर झाले असल्याने या योजनेचे काम सुरू असून, २४ कि.मी.चा असलेल्या बोगद्याचे काम १४.५० किमी झाले असून,जवळपास ६५ काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २२पर्यंत ही योजना पूर्ण होणार असल्याची माहिती गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ श्रेणी-१ अधिकारी राहुल घनवट यांनी दिली. या योजनेचे काम पूर्णक्षमतेने २४ तास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दर वर्षी पावसाळ्यात कृष्णेतील अतिरिक्त पाणी ११५ टीएमसी कर्नाटकात वाहून जाते. हे पाणी अडवून भीमा खोऱ्यात वळविल्यास दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. (यंदाच्या महापुरात कृष्णेतील सुमारे ७०० टीएमसी पाणी वाहून गेले आहे.) २००४ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प शासनाकडून मंजूर करून घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत सुमारे पाच हजार कोटींची होती. सन २००४ लाच आमदार सुरेश धस यांनी आष्टी

तालुक्याला १ टिएममसी पाणी मिळावे म्हणून राज्य मंञीमंडळात मागणी करत चारशे कोटी रुपयांचा खुंटेफळ साठवण तलाव मंजूर करून घेतला. निरा-भीमा नदीजोड प्रकल्पासाठी आजमितीला खर्च सुमारे साडेसात हजार कोटींच्या घरात जातो, असेही माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.