शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा रस्त्यावरील पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब ...

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. आता हा रस्ता अत्यंत चांगला झाला आहे. मात्र रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. या अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला अपघात होण्याची भीती असून हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने, शेख मोहसिन यांनी केली आहे.

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेला व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा या सोळा किलोमीटर अंतराच्या राज्य मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला होता. त्यात या रस्त्याला दोन वर्षापूर्वी निधी मिळून चांगले कामपण झाले आहे. मात्र याच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठ्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. हे सर्व पूल अर्धवट अवस्थेत असून याचे काम देखील बंद पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठी गावे असल्याने नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये -जा चालू असते. त्यामुळे या अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन सह अनेकांनी केली आहे.

तीन पुलांचे काम

या रस्त्यावर तीन पुलाचे काम चालू आहे.

रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला पुलाचे खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका होऊ शकतो.

त्यामुळे हे रखडलेल्या पुलाची कामे त्वरित करावीत, अशी मागणी होत आहे.

===Photopath===

020421\225920210402_151614_14.jpg