शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

एक एकर शेतीतून महिलेने कमावले पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

सेंद्रिय पद्धतीने पिकविली शेती : पतीच्या अपंगत्वाने आली जबाबदारी पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला ...

सेंद्रिय पद्धतीने पिकविली शेती : पतीच्या अपंगत्वाने आली जबाबदारी

पुरुषोत्तम करवा

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला अपघातामुळे अपंगत्व आले. सर्व जबाबदारी अंगावर पडली. संकटाला न घाबरता कुटुंबाची जबाबदारी पेलली. सध्या या महिलेने आपल्या शेतीत एक एकरात रेशीम शेती केली. यातून दरवर्षी पाच लाखांची कमाई होत आहे.

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे या अल्पशिक्षित महिलेची ही यशकथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. टालेवाडी येथील रहिवासी शिवराज फाटे (वय ४०) यांना नित्रुड शिवारातील टकारवाडी येथे चार एकर वडिलोपार्जीत जमीन वाटून आली. सुरुवातीला यांनी आपल्या शेतात कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, आदी पारंपरिक पिके घेतली. यामुळे शेतातील पिकापासून जास्त उत्पन्न मिळत नसे. शिवराज यांचे मेहुणे बीड येथील विवेक सोमवंशी यांच्या मित्राकडे रेशीम शेती असल्याने व त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी अनेक वेळा शिवराज यांंना रेशीम शेती करण्यास सांगितले.

सन २०११ साली एक एकर शेतात रेशीम शेती करण्याचे ठरवल्यानंतर वडिलांनी यास विरोध केला. परंतु त्यांचे ऐकले नाही. त्यांचे न ऐकता रेशमाचे उत्पन्न घेत राहिले. दरवर्षी उत्पन्नात वाढ होत असतानाच २०१५ साली वाहन अपघातात शिवराज यांचा पाय पूर्णपणे निकामी झाला. आता शेतातील रेशीम शेतीचे काय करायचे? असा प्रश्न पडला. यानंतर दोन वर्षे ही शेती हिश्श्याने दिली; परंतु याद्वारे केवळ खर्चाची बरोबरी होऊ लागली. शिवराज यांची पत्नी छाया यांनी असे नुकसान झाले; तर आपले अवघड होईल. तुम्ही मला काय करायचे? ते सांगा, यापुढे शेती हिश्श्याने द्यायची नाही असे पतीला सांगितले. त्यानुसार त्या मागील तीन वर्षांपासून रेशीम शेती करीत आहेत. त्यांना त्यांचा १४ वर्षांचा मुलगा वेदान्त मदत करीत आहे. रेशीम शेतीत वर्षात पाच लाॅट घेत त्या आहेत. दहा ते बारा क्विंटल माल तयार होतो. त्यास भावही चांगला मिळत असल्याने वर्षाला यांना पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न एक एकर रेशीम शेतीतून मिळत आहे. त्यांनी एकही मजूर न लावता रेशीमसाठी पाला खुडण्यापासून तो टाकणे, उगवणही घरीच केली. त्यासाठीे सेंद्रिय खतांचा वापर केला. यामुळे खर्चही वाचला. सध्या केवळ इतर खर्च पाच हजार रुपये येत आहे, असे छाया फाटे यांनी सांगितले.

----

रेशीम पिकासाठी उसाच्या मुकाबल्यात केवळ २५ टक्केच पाणी लागते. यापुढे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धत बंद करून रेशीम पीक पद्धतीकडे वळावे. रेशीम शेती महिलादेखील सहज करू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.

- छाया फाटे, महिला शेतकरी. ....

===Photopath===

290521\0207img_20210527_105707_14.jpg

===Caption===

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे यांनी फुलविलेली रेशीम शेती.