शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

एक एकर शेतीतून महिलेने कमावले पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

सेंद्रिय पद्धतीने पिकविली शेती : पतीच्या अपंगत्वाने आली जबाबदारी पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला ...

सेंद्रिय पद्धतीने पिकविली शेती : पतीच्या अपंगत्वाने आली जबाबदारी

पुरुषोत्तम करवा

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला अपघातामुळे अपंगत्व आले. सर्व जबाबदारी अंगावर पडली. संकटाला न घाबरता कुटुंबाची जबाबदारी पेलली. सध्या या महिलेने आपल्या शेतीत एक एकरात रेशीम शेती केली. यातून दरवर्षी पाच लाखांची कमाई होत आहे.

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे या अल्पशिक्षित महिलेची ही यशकथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. टालेवाडी येथील रहिवासी शिवराज फाटे (वय ४०) यांना नित्रुड शिवारातील टकारवाडी येथे चार एकर वडिलोपार्जीत जमीन वाटून आली. सुरुवातीला यांनी आपल्या शेतात कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, आदी पारंपरिक पिके घेतली. यामुळे शेतातील पिकापासून जास्त उत्पन्न मिळत नसे. शिवराज यांचे मेहुणे बीड येथील विवेक सोमवंशी यांच्या मित्राकडे रेशीम शेती असल्याने व त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी अनेक वेळा शिवराज यांंना रेशीम शेती करण्यास सांगितले.

सन २०११ साली एक एकर शेतात रेशीम शेती करण्याचे ठरवल्यानंतर वडिलांनी यास विरोध केला. परंतु त्यांचे ऐकले नाही. त्यांचे न ऐकता रेशमाचे उत्पन्न घेत राहिले. दरवर्षी उत्पन्नात वाढ होत असतानाच २०१५ साली वाहन अपघातात शिवराज यांचा पाय पूर्णपणे निकामी झाला. आता शेतातील रेशीम शेतीचे काय करायचे? असा प्रश्न पडला. यानंतर दोन वर्षे ही शेती हिश्श्याने दिली; परंतु याद्वारे केवळ खर्चाची बरोबरी होऊ लागली. शिवराज यांची पत्नी छाया यांनी असे नुकसान झाले; तर आपले अवघड होईल. तुम्ही मला काय करायचे? ते सांगा, यापुढे शेती हिश्श्याने द्यायची नाही असे पतीला सांगितले. त्यानुसार त्या मागील तीन वर्षांपासून रेशीम शेती करीत आहेत. त्यांना त्यांचा १४ वर्षांचा मुलगा वेदान्त मदत करीत आहे. रेशीम शेतीत वर्षात पाच लाॅट घेत त्या आहेत. दहा ते बारा क्विंटल माल तयार होतो. त्यास भावही चांगला मिळत असल्याने वर्षाला यांना पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न एक एकर रेशीम शेतीतून मिळत आहे. त्यांनी एकही मजूर न लावता रेशीमसाठी पाला खुडण्यापासून तो टाकणे, उगवणही घरीच केली. त्यासाठीे सेंद्रिय खतांचा वापर केला. यामुळे खर्चही वाचला. सध्या केवळ इतर खर्च पाच हजार रुपये येत आहे, असे छाया फाटे यांनी सांगितले.

----

रेशीम पिकासाठी उसाच्या मुकाबल्यात केवळ २५ टक्केच पाणी लागते. यापुढे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धत बंद करून रेशीम पीक पद्धतीकडे वळावे. रेशीम शेती महिलादेखील सहज करू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.

- छाया फाटे, महिला शेतकरी. ....

===Photopath===

290521\0207img_20210527_105707_14.jpg

===Caption===

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे यांनी फुलविलेली रेशीम शेती.