शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारे, पावसाने गंगामसल्यात हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:52 IST

शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे.

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यात वीज पडून ३ जणांचा मृत्यू । परिसरातील अनेक गावांमध्ये देखील मोठे नुकसान

माजलगाव : शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे.तालुक्यातील गंगामसला येथे वादळी वाऱ्यामुळे अवघ्या दहा मिनिटात गावातील सुमारे सत्तर टक्के घरावरील पत्रे उडून गेले. अनेक घरांच्या भिंतीनां तडे गेले. काही घरांचे माळवद खचले. लोखंडी पोल जमीनदोस्त झाले. त्यामुळे संपूर्ण गावभर विजेच्या तारा आडव्या उभ्या पडलेल्या होत्या. गावातील ५० टक्के झाडांपैकी काही तुटून तर काही उन्मळून पडली. यामुळे राष्ट्रीय महामार्गापासून गावात जाणारा रस्ता पूर्णत: बंद झाला. तो शनिवारी दुपारपर्यंतच बंदच होता. घटना घडल्यानंतर रात्री येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके हे काही सवंगड्यांसह गावातील लोकांना धीर देत होते. तसेच प्रशासनाला देखील त्यांनी याची वेळीच कल्पना दिली होती अनेक जणांना औषधोपचारासाठी मदत केली.पलंगामुळे वाचला चौघांचा जीवतुफान वाऱ्यांमुळे घराच्या वरील तसेच बाजूने लावलेले पूर्ण पत्रे उडून गेले. त्यात गावातील उडालेले पत्रे अंगावर कोसळत असल्याने गणेश गाडे व शिवकन्या गाडे यांनी जीव वाचविण्यासाठी घरातील पलंगाखाली अस्मिता व चैतन्य या मुलांसह आश्रय घेतला. पाऊस थांबल्यानंतर शेजाºया पाजाºयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना पलंगाखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.वादळी वा-यात अनेक जण जखमीतुफान पावसामुळे तसेच वाºयामुळे उडालेल्या पत्रे व दगडांमुळे अनेकजण जखमी झाले. अशोक पांढरे याच्या पायावर दगड पडल्याने त्याच्या पायाची नस तुटली. त्यांना बीड येथे उपचारासाठी पाठविले आहे. अर्चना कदम नामक महिला मानेला पत्रा लागल्याने गंभीर जखमी झाली. तसेच भालचंद्र सोळंके यांच्या डोक्याला पत्र्याचा मार लागला आहे. गणपत लांडगे यांच्या घरावर झाड पडल्याने ते जखमी झाले. तसेच रमेश पंडित, मुक्तीराम तावडे, महादेव पंडित, बाळासाहेब कदम, प्रकाश कदम, गंगुबाई लगड, तुळसाबाई धोंडे, एकनाथ धरपडे, शकील पठाण, तुकाराम सोळंके, वैजनाथ कदम आदी वादळी वाºयाच्या फटक्याने जखमी झाले आहेत. तसेच यमुनाबाई व त्यांचे पती हरिभाऊ सोनटक्के या वृद्ध जोडप्याचे संपूर्ण घर पडले.वादळी पावसाने घेतले तिघांचे बळीवादळी पावसामुळे तालुक्यातील नागडगाव येथील अंजली खामकर वय २५ हिचा शेतातून परत येत असताना वीज अंगावर पडून मृत्यू झाला. महातपुरी येथील पांडुरंग कचरूबा जामकर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच माजलगाव शहरातील फुलेनगर भागात राहणाºया आश्रफबी गणी सय्यद या ६० वर्षीय महिलेचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस