शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

वादळी वारे, पावसाने गंगामसल्यात हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 23:52 IST

शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे.

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यात वीज पडून ३ जणांचा मृत्यू । परिसरातील अनेक गावांमध्ये देखील मोठे नुकसान

माजलगाव : शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे.तालुक्यातील गंगामसला येथे वादळी वाऱ्यामुळे अवघ्या दहा मिनिटात गावातील सुमारे सत्तर टक्के घरावरील पत्रे उडून गेले. अनेक घरांच्या भिंतीनां तडे गेले. काही घरांचे माळवद खचले. लोखंडी पोल जमीनदोस्त झाले. त्यामुळे संपूर्ण गावभर विजेच्या तारा आडव्या उभ्या पडलेल्या होत्या. गावातील ५० टक्के झाडांपैकी काही तुटून तर काही उन्मळून पडली. यामुळे राष्ट्रीय महामार्गापासून गावात जाणारा रस्ता पूर्णत: बंद झाला. तो शनिवारी दुपारपर्यंतच बंदच होता. घटना घडल्यानंतर रात्री येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके हे काही सवंगड्यांसह गावातील लोकांना धीर देत होते. तसेच प्रशासनाला देखील त्यांनी याची वेळीच कल्पना दिली होती अनेक जणांना औषधोपचारासाठी मदत केली.पलंगामुळे वाचला चौघांचा जीवतुफान वाऱ्यांमुळे घराच्या वरील तसेच बाजूने लावलेले पूर्ण पत्रे उडून गेले. त्यात गावातील उडालेले पत्रे अंगावर कोसळत असल्याने गणेश गाडे व शिवकन्या गाडे यांनी जीव वाचविण्यासाठी घरातील पलंगाखाली अस्मिता व चैतन्य या मुलांसह आश्रय घेतला. पाऊस थांबल्यानंतर शेजाºया पाजाºयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना पलंगाखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.वादळी वा-यात अनेक जण जखमीतुफान पावसामुळे तसेच वाºयामुळे उडालेल्या पत्रे व दगडांमुळे अनेकजण जखमी झाले. अशोक पांढरे याच्या पायावर दगड पडल्याने त्याच्या पायाची नस तुटली. त्यांना बीड येथे उपचारासाठी पाठविले आहे. अर्चना कदम नामक महिला मानेला पत्रा लागल्याने गंभीर जखमी झाली. तसेच भालचंद्र सोळंके यांच्या डोक्याला पत्र्याचा मार लागला आहे. गणपत लांडगे यांच्या घरावर झाड पडल्याने ते जखमी झाले. तसेच रमेश पंडित, मुक्तीराम तावडे, महादेव पंडित, बाळासाहेब कदम, प्रकाश कदम, गंगुबाई लगड, तुळसाबाई धोंडे, एकनाथ धरपडे, शकील पठाण, तुकाराम सोळंके, वैजनाथ कदम आदी वादळी वाºयाच्या फटक्याने जखमी झाले आहेत. तसेच यमुनाबाई व त्यांचे पती हरिभाऊ सोनटक्के या वृद्ध जोडप्याचे संपूर्ण घर पडले.वादळी पावसाने घेतले तिघांचे बळीवादळी पावसामुळे तालुक्यातील नागडगाव येथील अंजली खामकर वय २५ हिचा शेतातून परत येत असताना वीज अंगावर पडून मृत्यू झाला. महातपुरी येथील पांडुरंग कचरूबा जामकर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच माजलगाव शहरातील फुलेनगर भागात राहणाºया आश्रफबी गणी सय्यद या ६० वर्षीय महिलेचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस