शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

प्रभात बुडुख बीड : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र शासनाने वाहनांसाठी काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी ...

प्रभात बुडुख

बीड : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र शासनाने वाहनांसाठी काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे या कामाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. जी वाहने १५ वर्षापेक्षा जास्त जुनी आहेत, अशा खासगी वाहनांना रस्त्यावरून चालविताना पुढील काळात निर्बंध येणार आहेत. ही वाहने चालवायची असेल तर आरटीओ विभागाकडून तपासणी करावी लागणार आहे. याशिवाय त्याचे नूतनीकरण प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. जुन्या गाड्या चालविताना ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसामान्य व्यक्तींच्या दृष्टीने न परवडणारी आहे.

दुचाकी, चारचाकी, ऑटो, ट्रक अशी वाहने मोठ्या प्रमाणात जुन्या काळापासून चालवली जात आहेत. प्रत्येकांना नवीन वाहन खरेदी करणे शक्य नाही. याशिवाय अनेक जण वाहन सुस्थितीत ठेवण्यासाठी वारंवार सर्व्हिसिंग करत काळजी घेत असतात, त्यामुळे १५ वर्षांपुढे देखील वाहने भंगारात काढणे परवडणारा निर्णय नसल्याचे मत नागरिकांचे आहे.

गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेट

नवीन नियमावलीमुळे अनेक वाहनधारकांना धास्ती भरली आहे. या नियमामध्ये गाडी चांगली असल्यास आरटीओ कार्यालय सुस्थितीचे प्रमाणपत्र देणार आहे.

खासगी वाहनांसाठी हे नूतनीकरण पाच वर्षांचे असणार आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी हे नूतनीकरण आठ वर्षांपर्यंत राहणार आहे.

भंगारातील २५ हजार वाहने धावतात रस्त्यावर

जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास २५ हजार वाहने मुदत संपूनही वापरात आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्षा, दुचाकी व मालवाहू वाहनांची संख्या आहे. त्या सर्वांना आता यापुढे वाहन चालवण्यासाठी आरटीओ कार्यालयाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.

जिल्ह्यात अंमलबजावणी कधीपासून ?

स्क्रॅप पॅटर्नची अंमलबजावणी कधीपासून करायची याबाबत सध्यातरी उपप्रादेशिक परिवहन विभागाला कुठलेही पत्र आलेले नाही. या नियमांचे पालन करण्याच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरून ज्या सूचना येतील त्याचे पालन होणार आहे. त्यामुळे अद्यापतरी जुन्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

ग्रीन टॅक्स भरावा लागणार

१५ वर्षांवरील जुन्या वाहनांना चालविण्यासाठी वाहन मालकांना ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे. यानंतरच वाहन चालविता येणार आहे.

संबंधित वाहन चालविण्यास योग्य आहे की नाही, याची तपासणी करावी लागेल. त्यानंतर आरटीओ विभाग त्याला पुढील वर्षासाठीच्या मुदतवाढीचा प्रस्ताव देणार आहे.