शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

प्रभात बुडुख बीड : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र शासनाने वाहनांसाठी काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी ...

प्रभात बुडुख

बीड : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र शासनाने वाहनांसाठी काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे या कामाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. जी वाहने १५ वर्षापेक्षा जास्त जुनी आहेत, अशा खासगी वाहनांना रस्त्यावरून चालविताना पुढील काळात निर्बंध येणार आहेत. ही वाहने चालवायची असेल तर आरटीओ विभागाकडून तपासणी करावी लागणार आहे. याशिवाय त्याचे नूतनीकरण प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. जुन्या गाड्या चालविताना ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसामान्य व्यक्तींच्या दृष्टीने न परवडणारी आहे.

दुचाकी, चारचाकी, ऑटो, ट्रक अशी वाहने मोठ्या प्रमाणात जुन्या काळापासून चालवली जात आहेत. प्रत्येकांना नवीन वाहन खरेदी करणे शक्य नाही. याशिवाय अनेक जण वाहन सुस्थितीत ठेवण्यासाठी वारंवार सर्व्हिसिंग करत काळजी घेत असतात, त्यामुळे १५ वर्षांपुढे देखील वाहने भंगारात काढणे परवडणारा निर्णय नसल्याचे मत नागरिकांचे आहे.

गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेट

नवीन नियमावलीमुळे अनेक वाहनधारकांना धास्ती भरली आहे. या नियमामध्ये गाडी चांगली असल्यास आरटीओ कार्यालय सुस्थितीचे प्रमाणपत्र देणार आहे.

खासगी वाहनांसाठी हे नूतनीकरण पाच वर्षांचे असणार आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी हे नूतनीकरण आठ वर्षांपर्यंत राहणार आहे.

भंगारातील २५ हजार वाहने धावतात रस्त्यावर

जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास २५ हजार वाहने मुदत संपूनही वापरात आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्षा, दुचाकी व मालवाहू वाहनांची संख्या आहे. त्या सर्वांना आता यापुढे वाहन चालवण्यासाठी आरटीओ कार्यालयाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.

जिल्ह्यात अंमलबजावणी कधीपासून ?

स्क्रॅप पॅटर्नची अंमलबजावणी कधीपासून करायची याबाबत सध्यातरी उपप्रादेशिक परिवहन विभागाला कुठलेही पत्र आलेले नाही. या नियमांचे पालन करण्याच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरून ज्या सूचना येतील त्याचे पालन होणार आहे. त्यामुळे अद्यापतरी जुन्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

ग्रीन टॅक्स भरावा लागणार

१५ वर्षांवरील जुन्या वाहनांना चालविण्यासाठी वाहन मालकांना ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे. यानंतरच वाहन चालविता येणार आहे.

संबंधित वाहन चालविण्यास योग्य आहे की नाही, याची तपासणी करावी लागेल. त्यानंतर आरटीओ विभाग त्याला पुढील वर्षासाठीच्या मुदतवाढीचा प्रस्ताव देणार आहे.