शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:37 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारचे पाणी मुरतंय कुठे ? : भरमसाट उपसा केल्यामुळे भूजल पातळी खालावली

बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २०१५ सालापासून जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याचे कागदोपत्री दिसत आहे. मात्र, तरी देखील जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना का करावा लागत आहे. या दुष्काळाला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जास्त पाणी लागणारी पिके घेऊन भरमसाठ पाणी उपसा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते ऊस हे पीक जिल्ह्याच्या भौगोलिकदृष्ट्या लागवडीसाठी योग्य नाही. मात्र, जास्त पैशाच्या हव्यासापायी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते व जमिनीवरील साठ्यातील पाणी संपल्यानंतर जमिनीच्या आतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यामुळे भूजल पातळी खालावत असून, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती दर एका वर्षाआड निर्माण होत आहे. मात्र, हा निसर्गनिर्मित दुष्काळ नसून मानवनिर्मित असल्याचे जलतज्ज्ञांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले. जलयुक्त शिवार योजना २०१५ पासून आजपर्यंत राबवली जात आहे. मात्र तरी देखील ज्या प्रमाणात कामे झाली असे सांगितले जाते त्या पटीने भूजलपातळी किंवा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचे जिल्ह्यात कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे ‘जलयुक्त शिवार योजना दुष्काळ निवारणासाठी होती का कंत्राटदारांना पोसण्यासाठी; असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.जलयुक्त शिवार योजनेची आकडेवाडी फसवी ?राज्य शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली. जिल्ह्यात १४०० गावे व वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी २०१५ ते २०१ब्९ या कालावधीत जवळपास १०१० गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी यावर्षीची कामे सुरु आहेत. तसेच रोहयो व इतर विभागाच्या माध्यमातून योजना राबवण्यात आल्याचा दावा शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली असतील तर पाणी मुरतय कुठं असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच २०१५ पासून झालेल्या विभागनिहाय कामांची तपासणी व चौकशीची मागणी होत आहे.उसाला फळबाग पर्यायबीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यातील धरणांमधील निम्म्यापेक्षा अधिक पाणी उपसा हा ऊस या पिकासाठी केला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्याय होत असून, तो टाळण्यासाठी ऊस पिकाला पर्याय फळबाग असल्याचे मत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून अधिकचे उत्पन्न मिळवायचे असेल तर फळबागा लावणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातून अनुदान देखील दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी फळबाग लागवड करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारwater shortageपाणीटंचाई