शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:37 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारचे पाणी मुरतंय कुठे ? : भरमसाट उपसा केल्यामुळे भूजल पातळी खालावली

बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २०१५ सालापासून जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याचे कागदोपत्री दिसत आहे. मात्र, तरी देखील जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना का करावा लागत आहे. या दुष्काळाला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जास्त पाणी लागणारी पिके घेऊन भरमसाठ पाणी उपसा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते ऊस हे पीक जिल्ह्याच्या भौगोलिकदृष्ट्या लागवडीसाठी योग्य नाही. मात्र, जास्त पैशाच्या हव्यासापायी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते व जमिनीवरील साठ्यातील पाणी संपल्यानंतर जमिनीच्या आतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यामुळे भूजल पातळी खालावत असून, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती दर एका वर्षाआड निर्माण होत आहे. मात्र, हा निसर्गनिर्मित दुष्काळ नसून मानवनिर्मित असल्याचे जलतज्ज्ञांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले. जलयुक्त शिवार योजना २०१५ पासून आजपर्यंत राबवली जात आहे. मात्र तरी देखील ज्या प्रमाणात कामे झाली असे सांगितले जाते त्या पटीने भूजलपातळी किंवा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचे जिल्ह्यात कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे ‘जलयुक्त शिवार योजना दुष्काळ निवारणासाठी होती का कंत्राटदारांना पोसण्यासाठी; असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.जलयुक्त शिवार योजनेची आकडेवाडी फसवी ?राज्य शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली. जिल्ह्यात १४०० गावे व वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी २०१५ ते २०१ब्९ या कालावधीत जवळपास १०१० गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी यावर्षीची कामे सुरु आहेत. तसेच रोहयो व इतर विभागाच्या माध्यमातून योजना राबवण्यात आल्याचा दावा शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली असतील तर पाणी मुरतय कुठं असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच २०१५ पासून झालेल्या विभागनिहाय कामांची तपासणी व चौकशीची मागणी होत आहे.उसाला फळबाग पर्यायबीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यातील धरणांमधील निम्म्यापेक्षा अधिक पाणी उपसा हा ऊस या पिकासाठी केला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्याय होत असून, तो टाळण्यासाठी ऊस पिकाला पर्याय फळबाग असल्याचे मत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून अधिकचे उत्पन्न मिळवायचे असेल तर फळबागा लावणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातून अनुदान देखील दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी फळबाग लागवड करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारwater shortageपाणीटंचाई