शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

टाकळशिंगची शाळा कुठे उभारायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

आष्टी : शासनाने तालुक्यातील टाकळसिंग येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला; मात्र ...

आष्टी : शासनाने तालुक्यातील टाकळसिंग येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला; मात्र गावात अवमेळ असल्याने शाळा बांधायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गावात शाळेसाठी आलेला निधी चक्क परत गेला आहे. गावकऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने आ. बाळासाहेब आजबेे यांनी निधी रद्द करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे अन् चर्चेत असणाऱ्या टाकळसिंग येथे स्व.आसराजी अण्णा जगताप यांनी ही शाळा १९५० साली स्थापन केली. परिसरातील तब्बल नऊ ते दहा गावातील विद्यार्थी आजपर्यंत शिक्षण घेत आहेत; मात्र सध्या या शाळेची इमारत अतिशय जुनी झालेली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत नवीन दोन मजली इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे; मात्र गावात शाळा बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने शाळा उभारणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही गावकऱ्यांच्या मते तळ्याच्या पट्टीत शाळा उभी करावी तर काही गावकरी गावात शाळा असावी या मताचे आहेत. या पेचात शाळेसाठी आलेला निधी दीड वर्षे होऊनही तो खर्च न केल्यामुळे आता परत गेला आहे. एकीकडे अनेक गावातील गावकरी शाळेसाठी गावाच्या विकासासाठी शासनाकडून निधी मागत आहेत; मात्र टाकळसिंग गावात शाळेसाठी आलेला निधी गावकऱ्यांच्या अवमेळामुळे परत गेला आहे. गावात खंडीभर पुढारी आहेत पण एकमेकांत ताळमेळ नसल्यामुळे अडचण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

तळ्याच्या पट्टीतच शाळा योग्य राहील

मी गावचा उपसरपंच असताना पाच वर्षांपूर्वी शाळेला तळ्याच्या पट्टीत पाच एकर जागा मिळवून दिलेली आहे.नवीन शाळा बांधायची म्हटले तर मैदान आणि शाळा प्रशस्त असायला पाहिजे. त्यामुळे ही शाळा व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. गावापासून हे अंतर अवघ्या सातशे मीटर आहे त्यामुळे इथं शाळा झाली तर सर्वांसाठी योग्य राहील असे सरपंच सुलोचना जोगदंड आणि माजी उपसरपंच बद्रिनाथ जगताप म्हणाले.

निधी रद्दबाबत आमदारांचे पत्र

पत्र

टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु ज्या जागेवर इमारत आहे, त्या जागेवर इमारत होत नसल्याने तसेच दुसऱ्या नवीन जागेवर इमारत उभी करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांमध्ये एकमत होत नसल्यामुळे हा निधी परत करण्यात यावा असे पत्र आ. बाळासाहेब आजबे यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.