शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

टाकळशिंगची शाळा कुठे उभारायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

आष्टी : शासनाने तालुक्यातील टाकळसिंग येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला; मात्र ...

आष्टी : शासनाने तालुक्यातील टाकळसिंग येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला; मात्र गावात अवमेळ असल्याने शाळा बांधायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गावात शाळेसाठी आलेला निधी चक्क परत गेला आहे. गावकऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने आ. बाळासाहेब आजबेे यांनी निधी रद्द करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे अन् चर्चेत असणाऱ्या टाकळसिंग येथे स्व.आसराजी अण्णा जगताप यांनी ही शाळा १९५० साली स्थापन केली. परिसरातील तब्बल नऊ ते दहा गावातील विद्यार्थी आजपर्यंत शिक्षण घेत आहेत; मात्र सध्या या शाळेची इमारत अतिशय जुनी झालेली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत नवीन दोन मजली इमारत बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे; मात्र गावात शाळा बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने शाळा उभारणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही गावकऱ्यांच्या मते तळ्याच्या पट्टीत शाळा उभी करावी तर काही गावकरी गावात शाळा असावी या मताचे आहेत. या पेचात शाळेसाठी आलेला निधी दीड वर्षे होऊनही तो खर्च न केल्यामुळे आता परत गेला आहे. एकीकडे अनेक गावातील गावकरी शाळेसाठी गावाच्या विकासासाठी शासनाकडून निधी मागत आहेत; मात्र टाकळसिंग गावात शाळेसाठी आलेला निधी गावकऱ्यांच्या अवमेळामुळे परत गेला आहे. गावात खंडीभर पुढारी आहेत पण एकमेकांत ताळमेळ नसल्यामुळे अडचण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

तळ्याच्या पट्टीतच शाळा योग्य राहील

मी गावचा उपसरपंच असताना पाच वर्षांपूर्वी शाळेला तळ्याच्या पट्टीत पाच एकर जागा मिळवून दिलेली आहे.नवीन शाळा बांधायची म्हटले तर मैदान आणि शाळा प्रशस्त असायला पाहिजे. त्यामुळे ही शाळा व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. गावापासून हे अंतर अवघ्या सातशे मीटर आहे त्यामुळे इथं शाळा झाली तर सर्वांसाठी योग्य राहील असे सरपंच सुलोचना जोगदंड आणि माजी उपसरपंच बद्रिनाथ जगताप म्हणाले.

निधी रद्दबाबत आमदारांचे पत्र

पत्र

टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु ज्या जागेवर इमारत आहे, त्या जागेवर इमारत होत नसल्याने तसेच दुसऱ्या नवीन जागेवर इमारत उभी करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांमध्ये एकमत होत नसल्यामुळे हा निधी परत करण्यात यावा असे पत्र आ. बाळासाहेब आजबे यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.