शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गहू खरेदीचा करार; तिघांकडून ६० लाखाला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:50 IST

एक वर्षापूर्वी गहू खरेदीचा लेखी करार केला असून, यापोटी वेळोवेळी टप्प्याटप्प्यात साठ लाख रुपये घेतले. याउपरही करार पूर्ण न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ईश्वर शिंगटे (रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात दोन दलाल व करारदार असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : आष्टी तालुक्यातील व्यापाराला मुंबई, इंदौरवाल्यांनी घातला गंडा

कडा : एक वर्षापूर्वी गहू खरेदीचा लेखी करार केला असून, यापोटी वेळोवेळी टप्प्याटप्प्यात साठ लाख रुपये घेतले. याउपरही करार पूर्ण न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ईश्वर शिंगटे (रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात दोन दलाल व करारदार असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आष्टी तालुक्यातील कडा येथील विठ्ठल सोनवणे, गोरेगाव मुंबई येथील तेजन मुन्शी, या दोन दलालांच्या माध्यमातून ग्लोबलअ‍ॅग्रो इंडस्ट्रीजसाठी आष्टी येथील व्यापारी ईश्वर काशिनाथ शिंगटे यांनी इंदौर (मध्यप्रदेश) येथील विजय यादव यांच्यासोबत गहू खरेदीचा लेखी करार २० नोव्हेंबर २०१८ रोजी केला होता. त्या करारापोटी शिंगटे यांनी टप्प्याटप्प्याने चेक व आरटीईजीएसच्या माध्यमातून साठ लाख रुपये दिले होते. सदरील कराराचे पैसे देखील दोन दलालांना देण्यात आले होते. पण या दलालांनी अंधारात ठेवून परस्पर पैसे हडप केल्याचे समजताच ईश्वर शिंगटे यांच्या फिर्यादीवरुन गुरूवारी रात्री तिघांविरोधात लेखी कराराचे उल्लंघन व फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल झाला आहे. आरोपी फरार असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत मोरे करीत आहेत.पोलिसांनी फिर्यादीला दिला कोर्टात जाण्याचा सल्लाईश्वर शिंगटे यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षण दिसताच त्यांनी ४ जून २०१९ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात, तर ६ जून २०१९ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात फिर्याद दिली होती.मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करीत कसलीही कारवाई केली नाही. उलट फिर्यादीला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रfraudधोकेबाजी