शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

गारपिटीच्या तडाख्यातील गहू काढणीला झाला महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:32 IST

: ऐन काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकावर झालेल्या गारपिटीमुळे गव्हाचे पीक काढणीस महाग झाले आहे. मागील महिन्यात झालेल्या गारपिटीने ...

: ऐन काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकावर झालेल्या गारपिटीमुळे गव्हाचे पीक काढणीस महाग झाले आहे. मागील महिन्यात झालेल्या गारपिटीने गहू काढणारे शेतकरी नशिबाला दोष देत काढणी करत आहेत.

शेतकऱ्यांनी खरिपातील अतिवृष्टीच्या कटू आठवणीतून सावरत रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. खरिपाची पिके गेली पण चांगल्या पावसामुळे पाणी मुबलक असल्याने रब्बीची पिकेही चांगली आली. ‘खरीप गेला पण रब्बी तारणार’ या भाबड्या आशेवर पुन्हा शेतकरी जोमाने कामाला लागत मेहनतीने उभे राहून रब्बी पिकाला जिवापाड जपले. पीक उगवून फळाला आले आता काढणी करायचे ठरले.

पण पुन्हा दुर्दैव आडे आले. मार्चच्या शेवटी आलेल्या तुफान गारपिटीने पिके भुईसपाट झाली.

यात फळबागांसह सर्वात जास्त नुकसान काढणीस आलेल्या गव्हाचे झाले. ओंबी भरल्यानंतर आलेला पाऊस व गारपिटीने गहू जमिनीवर झोपला. त्यामुळे मातीत मिसळल्याने ओंब्या खराब झाल्या. आता समोर दिसलेले पीक काढावे तर लागणारच त्यामुळे शेतकरी काढणी करत आहेत. पण अनेक शेतकऱ्यांना गव्हाचे पीक काढणीसही महाग झाले आहे.

मळणीयंत्रवाल्याला पायलीला पोतं

गव्हाची मजुरांकडून काढणी करुन मळणी यंत्रातून काढावा लागतो. त्याला ही शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. काढणीसाठी मजुरांना एकरी चार हजारांपर्यंत खर्च लागतो. तर मळणीयंत्राला पोत्याला (गोणी) एक पायली धान्य घेतो. म्हणजे ५० किलोला १० किलो गहू द्यावा लागताे. पिकांचा खर्च जाऊन हाती काहीच शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे.

हार्वेस्टरवाल्यांकडून ही लूट

गव्हाच्या काढणी वेळी पंजाबमधून हार्वेस्टर येतात. इकडे काही लोक एजंट असतात. त्यामुळे त्या एजंटाचे कमिशन काढण्यासाठी हार्वेस्टरवाले शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतात. सध्या एकरी तीन हजार रूपये दर चालू आहे. पण मजूर मळणी यंत्राचा राडा नको म्हणत शेतकरी हार्वेस्टरलाच पसंती देत आहेत.

डागी गव्हाला दरही कमीच

आधीच शेतकऱ्यांच्या मालाला दर कमी असतो. सध्या गव्हाचे दरही १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. त्यात गारपीट व पावसामुळे गव्हाचा रंग बदलल्याने त्यास अगदी कमी दर मिळत असल्यामुळे यातही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.