शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत गेला आणि तिसऱ्या टप्प्यात बीडचा समावेश झाल्याने जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. ...

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत गेला आणि तिसऱ्या टप्प्यात बीडचा समावेश झाल्याने जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून मोबाइलच्या दुकानांत दुरुस्ती तसेच ॲक्सेसरिज, मोबाइल खरेदीसाठी गर्दी दिसून आली. मात्र बहुतांश ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी सर्व प्रकारची दक्षता घेत व्यवहार सुरू होते. या दुकानांतील गर्दी पाहून अनेक ग्राहकांनी मोबाइल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, अशी मानसिकता करत तूर्त खरेदी करण्याचे टाळले.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस उद्रेक वाढत गेला. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत गेली. परिणामी प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागल्या. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध लादण्यात आले त्यामुळे दोन महिने दुकाने बंद होती. लॉकडाऊन काळात मोबाइलआधारेच अनेकांना आपली विविध कामे करता आली. ऑनलाइन व्यवहार, ऑनलाइन शिक्षण घेता आले; परंतु मोबाइल वापरताना अनेक अडचणी आल्या. दुरुस्तीसाठी दुकाने बंद होती. त्यामुळे लागणारे साहित्य खरेदी करता आले नाही. अखेर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दररोजच्या वापरात अतिमहत्त्वाचे साधन असलेल्या मोबाइलच्या दुकानांवर नवीन खरेदीसह दुरुस्ती व ॲक्सेसरिज खरेदीसाठी कोरोनाचे भान विसरून ग्राहकांची गर्दी दिसून आली.

कशासाठी गर्दी

मोबाइलची बॅटरी फुगणे, मोबाइल हँग होणे, संपर्क सुरू असताना अचानक बंद होणे, चार्जर खराब होणे, चार्जरचे केबल खराब होणे, कॉम्बो, स्क्रीन गार्ड, मोबाइल कव्हर, हेडफोन, डिस्प्ले खरेदी तसेच मोबाइल बॉडी बदलण्यासाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली.

दोन महिन्यांपासून बाजार बंद

गेल्या दोन महिन्यांपासून ॲक्सेसरिज आणि मोबाइलची दुकाने बंद असल्यामुळे ग्राहकांना अडचणी आल्या. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात मोबाइल विक्री, दुरुस्ती आणि सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची संख्या जवळपास दोन हजारांच्या घरात आहे. या दुकानांवर किमान दोन जणांना रोजगार मिळतो. जवळपास पाच हजार जणांचा रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र लॉकडाऊनमुळे दोन महिने रोजगाराला फटका बसला.

-------------

माझ्या मोबाइलची बॅटरी आणि डिस्प्ले खराब झाल्याने महिनाभराआधीच बिघडला. पण दुकाने बंद असल्याने घरातला साधा फोन वापरावा लागला. दुकाने उघडल्याने दुरुस्तीसाठी गेलो तर गर्दी दिसून आली. त्यामुळे दुकानात जायचे टाळून परतलो. - इंद्रजित जाधव

--------------

जुना मोबाइल खराब झाल्याने दुरुस्त करायचा हाेता. तसेच नवा ॲन्ड्राॅइड माेबाइल घ्यायचा होता. मात्र दोन महिन्यांपासून घेता आला नाही. दुकाने उघडल्याने आधी जुना मोबाइल दुरुस्त करून घेतला. कोरोनाबाबत मी दक्ष होतो. - अनिकेत वडमारे, बीड

----------

लॉकडाऊनमुळे दोन महिने दुकान बंद होते. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला. दुकान उघडल्यानंतर चार्जर केबल, डिस्प्ले, कॉम्बोला मागणी होती. दुकानात आमच्यासह ग्राहकांना मास्क अनिवार्य केले आहे. सॅनिटायझरचा वापर करतो. सोशल डिस्टन्सही पाळले जाते. - बुधाराम विष्णोई, व्यापारी, बीड

-----------

लॉकडाऊनमुळे मोबाइल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता दुकाने उघडली आहेत. ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच आवश्यक ते साहित्य, मोबाइल खरेदी केल्यास येथील बाजारपेठेला बळ मिळेल. कोराना नियमांचे पालन करून ग्राहकांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. - नवनाथ बागलाणे, व्यापारी, बीड

-----

मोबाइल रिपेअरिंगचे काम करून दिवसाकाठी २५० रुपये मिळायचे. लॉकडाऊनमुळे दोन महिने माझ्यासाठी अत्यंत वाईट गेले. आता पुन्हा काम सुरू केले आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर तसेच साेशल डिस्टन्सिंन पाळतो. ग्राहकही मास्क वापरत आहेत. - ज्ञानेश्वर घोरपडे, बीड

----------

दोन महिने रिपेअरिंगचे काम बंद होते. त्यामुळे गावाकडे शेतातील कामे केली. सोमवारपासन पुन्हा काम सुरू केले आहे. ओव्हर चार्जिंगमुळे बॅटरी फुगणे, आयसी बॉडी डॅमेज होणे, डिस्प्ले दुरुस्तीची कामे येत आहेत. - सुशांत खंदारे, बीड