शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जनावरांचा मृत्यू कशामुळे ? आता नमुने पुण्याच्या लॅबमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:39 IST

तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील १० दिवसांपासून अज्ञात रोगामुळे जवळपास ४० जनावरांचा मृत्यू झाला असून, या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्दे१० दिवसांनंतरही कारण अस्पष्ट : अंथरवण पिंपरीतील पशुपालकांची मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील १० दिवसांपासून अज्ञात रोगामुळे जवळपास ४० जनावरांचा मृत्यू झाला असून, या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर पाठविलेल्या नमुन्यांचे मराठवाड्यासाठी असलेल्या औरंगाबाद येथील रोगनिदान प्रयोगशाळेतही निदान झाले नसल्याने हे नमुने आता पुणे येथील विभागीय रोगनिदान (रोग अन्वेषण) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शासनाच्या प्रयोगशाळांमधील असुविधा यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. आता पुणे येथील अहवाल आल्यानंतरच जनावरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, मात्र तोपर्यंत पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.अंथरवन पिंपरी येथे जनावरांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाल्यानंतर पशुपालकांमध्ये खळबळ उडाली. तर लोकप्रतिनिधी व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पशुपालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रानुसार अंथरवन पिंपरी व लगतच्या परिसरातील शेतकºयांच्या पाच शेळ्या, ३०-३२ कोकरे, मेंढ्या तसेच व ५ ते ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सतर्क झालेल्या पशुसंवर्धन विभागाने गावातील जनावरांवर उपचार करण्यासाठी मोहीम सुरु केली. ८ डॉक्टरांचे पथक गावात ठाण मांडून आहे. रविवारपर्यंत ७०० जनावरांचे लसीकरण पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. तसेच इतर उपचारामुळे मागील दोन दिवसात जनावरे दगावली नसल्याचे सांगण्यात आले. जनावरांच्या मृत्यूचे दहा दिवसानंतरही कारण स्पष्ट झाले नाही. रोगाचे निदान होत नसल्यामुळे उपचारात अडचणी येत आहेत. मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट असल्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम आहे.औरंगाबाद : निदान झाले नाहीदरम्यान ८ डॉक्टरांच्या पथकामार्फत सुरु असलेले उपचार व लसीकरणामुळे जनावरांचे मृत्यू रोखण्यात यश आले आहेत.तसेच ज्या जनावरांना लागण झाल्याची शक्यता आहे अशा ९ गायी, ९ म्हशी, व ११ शेळ््यांवर रविवारी उपचार करण्यात आले आहेत.औरंगाबादच्या प्रयोगशाळेत निदान न झाल्याने पुणे येथील प्रयोगशाळेकडे नमुने पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र