शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आठवडी बाजार फूल; मास्क मात्र गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

अमोल जाधव नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे ...

अमोल जाधव

नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगल कार्यालये, सिनेमागृह, सामूहिक विवाह सोहळे, सभा धार्मिक कार्यक्रम यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. असे असताना जिल्ह्यातील आठवडी बाजारात कोणतेच नियम पाळले जात नाहीत.

कार्यक्रमाच्या दहापट गर्दी करून ग्रामीण भागात बाजार भरून गर्दी केली जाते; परंतु त्यांना सूचना द्यायला किंवा सांगायला कोणीच नसते. नांदुरघाट येथे मंगळवारी आठवडी बाजार होता; परंतु बाजारात बहुतांश व्यापाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. ते पाहून बाजारात परिसरातील आलेले लोक हे विना मास्क व गर्दी करून दिसले. त्यामुळे आज दिवसभर नांदुरघाटचा बाजार फूल होता; परंतु मास्कबाबत प्रत्येक माणूस गूल होता. नांदूरघाटच्या आठवडी बाजारात ग्रामपंचायतने कोणतेच नियोजन अथवा सूचना केल्याच्या दिसून आल्या नाहीत. शहरामध्ये नगर परिषद मास्क नसेल तर दंड पोलिसांच्या मदतीने वसूल करत आहे व सवय लावत आहे. लॉकडाऊन पडल्यावर गोरगरिबांचे मोठे व व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने बाजारामध्ये कडक नियम करून सवय लावायला पाहिजे. गर्दी असली तरी त्या ठिकाणी प्रत्येक जण मास्क लावून बोलला तर संसर्ग पसरण्याचा धोका कमी होईल जर अशीच निष्काळजी स्थानिक पातळीवर झाली तर रोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल व पुन्हा नियंत्रणात येणार नाही.