शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार फूल; मास्क मात्र गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

अमोल जाधव नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे ...

अमोल जाधव

नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगल कार्यालये, सिनेमागृह, सामूहिक विवाह सोहळे, सभा धार्मिक कार्यक्रम यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. असे असताना जिल्ह्यातील आठवडी बाजारात कोणतेच नियम पाळले जात नाहीत.

कार्यक्रमाच्या दहापट गर्दी करून ग्रामीण भागात बाजार भरून गर्दी केली जाते; परंतु त्यांना सूचना द्यायला किंवा सांगायला कोणीच नसते. नांदुरघाट येथे मंगळवारी आठवडी बाजार होता; परंतु बाजारात बहुतांश व्यापाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. ते पाहून बाजारात परिसरातील आलेले लोक हे विना मास्क व गर्दी करून दिसले. त्यामुळे आज दिवसभर नांदुरघाटचा बाजार फूल होता; परंतु मास्कबाबत प्रत्येक माणूस गूल होता. नांदूरघाटच्या आठवडी बाजारात ग्रामपंचायतने कोणतेच नियोजन अथवा सूचना केल्याच्या दिसून आल्या नाहीत. शहरामध्ये नगर परिषद मास्क नसेल तर दंड पोलिसांच्या मदतीने वसूल करत आहे व सवय लावत आहे. लॉकडाऊन पडल्यावर गोरगरिबांचे मोठे व व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने बाजारामध्ये कडक नियम करून सवय लावायला पाहिजे. गर्दी असली तरी त्या ठिकाणी प्रत्येक जण मास्क लावून बोलला तर संसर्ग पसरण्याचा धोका कमी होईल जर अशीच निष्काळजी स्थानिक पातळीवर झाली तर रोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल व पुन्हा नियंत्रणात येणार नाही.