शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

आठवडी बाजार फूल; मास्क मात्र गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

अमोल जाधव नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे ...

अमोल जाधव

नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगल कार्यालये, सिनेमागृह, सामूहिक विवाह सोहळे, सभा धार्मिक कार्यक्रम यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. असे असताना जिल्ह्यातील आठवडी बाजारात कोणतेच नियम पाळले जात नाहीत.

कार्यक्रमाच्या दहापट गर्दी करून ग्रामीण भागात बाजार भरून गर्दी केली जाते; परंतु त्यांना सूचना द्यायला किंवा सांगायला कोणीच नसते. नांदुरघाट येथे मंगळवारी आठवडी बाजार होता; परंतु बाजारात बहुतांश व्यापाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. ते पाहून बाजारात परिसरातील आलेले लोक हे विना मास्क व गर्दी करून दिसले. त्यामुळे आज दिवसभर नांदुरघाटचा बाजार फूल होता; परंतु मास्कबाबत प्रत्येक माणूस गूल होता. नांदूरघाटच्या आठवडी बाजारात ग्रामपंचायतने कोणतेच नियोजन अथवा सूचना केल्याच्या दिसून आल्या नाहीत. शहरामध्ये नगर परिषद मास्क नसेल तर दंड पोलिसांच्या मदतीने वसूल करत आहे व सवय लावत आहे. लॉकडाऊन पडल्यावर गोरगरिबांचे मोठे व व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने बाजारामध्ये कडक नियम करून सवय लावायला पाहिजे. गर्दी असली तरी त्या ठिकाणी प्रत्येक जण मास्क लावून बोलला तर संसर्ग पसरण्याचा धोका कमी होईल जर अशीच निष्काळजी स्थानिक पातळीवर झाली तर रोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल व पुन्हा नियंत्रणात येणार नाही.