शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार बंद; गुजरी बाजार सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

अनिल महाजन लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंदचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलतीच्या ...

अनिल महाजन

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंदचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलतीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी मुभा दिलेली आहे. या कालावधीत भरणारे गुजरी बाजार मात्र सुसाट आहेत. आठवडी बाजार अद्यापही बंद असल्याने ग्रामीण अर्थचक्र लॉकडाऊनमध्ये रुतलेलेलच आहे, तर भरणाऱ्या गुजरी बाजारात ग्राहकांसह व्यापारी कोरोनाचे भान विसरून व्यवहार करत आहेत. या गर्दीला रोखणे प्रशासनापुढे आव्हान आहे.

नगर परिषदेजवळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार व शुक्रवार दोन दिवस आठवडी बाजार भरतो. मात्र लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमालीचे कमी आहे. त्याचबराेबर बाजारात विविध व्यवसाय करणारे व्यापारीदेखील बंदमुळे इकडे फिरकत नाहीत. सध्या भाजीपाला विक्रेते दररोज हनुमान चौकात सकाळी गर्दी करतात. पोलीस, नगर परिषद किंवा तहसील प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी येताच येथील विक्रेते धावपळ करतात. नागरिकांनीही या त्रासाला कंटाळून गुजरी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, १८ जूनपासून ही गर्दी रोखण्यासाठी नगर परिषदेने नेहमीच्या ठिकाणी गुजरी बाजाराचे नियोजन केले आहे. परंतु या ठिकाणीही कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले.

विक्रेतेही बेफिकीर

कुठेही गुजरी बाजार भरत असल्याने व भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून दररोजच नियमांचे उल्लंघन होत असल्याने व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत. नगर परिषदेने ताकीद दिल्याने हनुमान चौकाऐवजी लगतच्या परिसरात फळे, भाजीपाला विक्रेते बसले. मात्र मास्क, सॅनिटायझरचा वापर होताना दिसला नाही.

ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग

धारूरच्या शुक्रवारच्या गुजरी बाजारात गर्दी झाली. अनेकांनी मास्कही घातले नव्हते. नगर परिषदेने व्यवस्थित नियोजन केल्याने थोडा सुरळीतपणा दिसत होता. मुख्य रस्त्यावरील रोजची गर्दी कमी झाली होती. नागरिक मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता बिनधास्तपणे फिरताना दिसत होते.

बाजार बंदमुळे उलाढालीला फटका

आठवडी बाजार बंद असल्याने ग्रामीण जनतेची गैरसोय होत आहे. शेतातील पिकवलेला माल विकण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. बाजार सुरू करावा तर कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आणि बंद ठेवला तर व्यापारी व्यावसायिकांना फटका अशा स्थितीत संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे.

नगर परिषदेकडून जागेचे नियोजन

धारूर शहरातील नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची सोय व्हावी व कोरोना नियमांचे पालन व्हावे, या हेतूने नगर परिषदेने भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सचे पालन करीत बसण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

- नितीन बागुल, मुख्याधिकारी, नगर परिषद, धारूर

===Photopath===

190621\19bed_1_19062021_14.jpg