शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

घाटनांदूर : मागील एक-दोन आठवड्यांत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र नुकसान झाले असून, नगदी पीक असलेल्या सोयाबीनसह ...

घाटनांदूर : मागील एक-दोन आठवड्यांत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र नुकसान झाले असून, नगदी पीक असलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवडनिवड न करता सरसकट नुकसानभरपाई कशी देता येईल यासाठी प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन पाठीशी असल्याची ग्वाही विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड यांनी दिली.

रविवारी संपूर्ण दिवसभर आ. संजय दौंड यांनी कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पट्टीवडगाव जिल्हा परिषद गणामधील सर्व गावे, तसेच घाटनांदूरसह परिसरातील घोलपवाडी, चोथेवाडी, मुरंबी, लिंबगाव या भागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवीत प्रत्यक्ष पाहणी केली. आ. दौंड यांच्याकडे व्यथा मांडत अनेक शेतकरी हमसून रडत होते. याप्रसंगी कृउबा संचालक ॲड. इंद्रजित निळे, बाबूराव जाधव, मंडळ कृषी अधिकारी जी. डी. ठाकूर, कृषी सहायक एन. बी. गायकवाड, तलाठी एस. एल. कराड, तलाठी मगर, महसूल मंडळ अधिकारी अंबाड व शेतकरी उपस्थित होते.

काय दिसले

डोंगरी भागापेक्षा घाटमाथ्यावरील जमिनीतील पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कित्येक दिवस पाण्याखाली पिके राहिल्याने सडली आहेत. सततच्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगा सडल्या आहेत. चोथेवाडी भागात रेणा नदीच्या शेजारील उभ्या पिकात शेतात जमा झालेल्या पाण्याचा अद्याप निचरा झालेला नसल्याचे या पाहणीत दिसून आले.

एकही शेतकरी वंचित राहणार नाही

ऑनलाइन नोंद होईल अथवा नाही सरसकट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, तशा सूचना प्रशासनाला दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. नुकसानभरपाई सरसकट मिळवून देणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

130921\img-20210912-wa0021.jpg

आ संजय दौंड शेतकऱ्यांच्या बांधावर .