शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

घाटनांदूर : मागील एक-दोन आठवड्यांत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र नुकसान झाले असून, नगदी पीक असलेल्या सोयाबीनसह ...

घाटनांदूर : मागील एक-दोन आठवड्यांत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र नुकसान झाले असून, नगदी पीक असलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवडनिवड न करता सरसकट नुकसानभरपाई कशी देता येईल यासाठी प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन पाठीशी असल्याची ग्वाही विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड यांनी दिली.

रविवारी संपूर्ण दिवसभर आ. संजय दौंड यांनी कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पट्टीवडगाव जिल्हा परिषद गणामधील सर्व गावे, तसेच घाटनांदूरसह परिसरातील घोलपवाडी, चोथेवाडी, मुरंबी, लिंबगाव या भागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवीत प्रत्यक्ष पाहणी केली. आ. दौंड यांच्याकडे व्यथा मांडत अनेक शेतकरी हमसून रडत होते. याप्रसंगी कृउबा संचालक ॲड. इंद्रजित निळे, बाबूराव जाधव, मंडळ कृषी अधिकारी जी. डी. ठाकूर, कृषी सहायक एन. बी. गायकवाड, तलाठी एस. एल. कराड, तलाठी मगर, महसूल मंडळ अधिकारी अंबाड व शेतकरी उपस्थित होते.

काय दिसले

डोंगरी भागापेक्षा घाटमाथ्यावरील जमिनीतील पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कित्येक दिवस पाण्याखाली पिके राहिल्याने सडली आहेत. सततच्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाच्या शेंगा सडल्या आहेत. चोथेवाडी भागात रेणा नदीच्या शेजारील उभ्या पिकात शेतात जमा झालेल्या पाण्याचा अद्याप निचरा झालेला नसल्याचे या पाहणीत दिसून आले.

एकही शेतकरी वंचित राहणार नाही

ऑनलाइन नोंद होईल अथवा नाही सरसकट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, तशा सूचना प्रशासनाला दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. नुकसानभरपाई सरसकट मिळवून देणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

130921\img-20210912-wa0021.jpg

आ संजय दौंड शेतकऱ्यांच्या बांधावर .