शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत पाण्याची बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:49 IST

शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देआठवड्याला पुरवठा : अनेक जलवाहिन्या नादुरुस्त

अंबाजोगाई : शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी पाणी भरण्यासाठी दिवस घालवावा लागत आहे.शहरात मागील १५ वर्षांपासून आठवडयात एकदाच पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नाही. त्यामुळे ज्या दिवशी नळाला पाणी येणार त्यादिवशी पाणी येण्याची वेळही निश्चित नसते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी व पाण्याच्या प्रतीक्षेत दिवस घालवण्याची वेळ अंबाजोगाईकरांवर आली आहे.शहरात पाणीपुरवठ्यासाठी वेळापत्रकाची आखणी प्रशासनाने अजूनही केलेली नाही. परिणामी पाणी कधी सुटणार याची माहिती घेऊनच शहरवासियांना दिनक्रम ठरवावा लागतो. आठवड्यातून एक वेळा सुटणाºया पाण्यामुळे मोठा पाणीसाठा करण्याची वेळ शहरवासियांवर येते. अवेळी पाणी आले तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. काही कारणामुळे पाण्याची वेळ चुकली तर आठवडाभर पाण्यासाठी ठणठणाट करण्याची वेळ येते. शहरातील गुरुवारपेठ, मंगळवारपेठ, भटगल्ली, चौभारा, जिरेगल्ली, रविवारपेठ, सातपुते गल्ली, खडकपुरा, कुत्तरविहिर या भागातील जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. शहरातील अनेक जलवाहिन्या नादुरुस्त आहेत. बारा वर्षांपूर्वी अंबाजोगाई नगर परिषदेला शासनाने ६५ कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या योजनेचे नवीन जलकुंभ व शहरातील जलवाहिन्याचे काम होऊनही ही पाणीपुरवठा योजना अद्यापही पूर्णत्वाकडे गेली नाही.पाणी सोडण्याचे ठराविक वेळापत्रक तयार कराअंबाजोगाई शहराला होणाºया अनियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरवासियांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाने पाणी सोडण्याची वेळ नागरिकांना ठरवून दिली तर गैरसोय दूर होईल, यासाठी पाणी सोडण्याचे वेळापत्रक बंधनकारक करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुलभा सोळंके यांनी केली आहे.पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी रस्त्यावर खड्डे कायमअंबाजोगाई शहरातील अनेक भागात अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने चांगले रस्ते करण्यात आले. या रस्त्याचे काम होते ना होते तो महिनाभरातच पाईपलाईनचे लिकेजेस व विविध कारणांमुळे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रस्ते खोदून ठेवले जात आहेत. हे खोदलेले रस्ते काम होताच माती ढकलून जैसे थे राहतात. आठवडाभरानंतरच या रस्त्यावर खड्डे पडू लागतात, अशी स्थिती शहरातील अनेक भागांमध्ये झाली आहे. रस्ते तयार करण्यापूर्वी अशी दुरूस्तीची कामे उरकून घेतली तर रस्त्याच्या तक्रारी कमी होतील, अशा प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईwater scarcityपाणी टंचाई