शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत पाण्याची बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:49 IST

शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देआठवड्याला पुरवठा : अनेक जलवाहिन्या नादुरुस्त

अंबाजोगाई : शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी पाणी भरण्यासाठी दिवस घालवावा लागत आहे.शहरात मागील १५ वर्षांपासून आठवडयात एकदाच पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नाही. त्यामुळे ज्या दिवशी नळाला पाणी येणार त्यादिवशी पाणी येण्याची वेळही निश्चित नसते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी व पाण्याच्या प्रतीक्षेत दिवस घालवण्याची वेळ अंबाजोगाईकरांवर आली आहे.शहरात पाणीपुरवठ्यासाठी वेळापत्रकाची आखणी प्रशासनाने अजूनही केलेली नाही. परिणामी पाणी कधी सुटणार याची माहिती घेऊनच शहरवासियांना दिनक्रम ठरवावा लागतो. आठवड्यातून एक वेळा सुटणाºया पाण्यामुळे मोठा पाणीसाठा करण्याची वेळ शहरवासियांवर येते. अवेळी पाणी आले तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. काही कारणामुळे पाण्याची वेळ चुकली तर आठवडाभर पाण्यासाठी ठणठणाट करण्याची वेळ येते. शहरातील गुरुवारपेठ, मंगळवारपेठ, भटगल्ली, चौभारा, जिरेगल्ली, रविवारपेठ, सातपुते गल्ली, खडकपुरा, कुत्तरविहिर या भागातील जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. शहरातील अनेक जलवाहिन्या नादुरुस्त आहेत. बारा वर्षांपूर्वी अंबाजोगाई नगर परिषदेला शासनाने ६५ कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या योजनेचे नवीन जलकुंभ व शहरातील जलवाहिन्याचे काम होऊनही ही पाणीपुरवठा योजना अद्यापही पूर्णत्वाकडे गेली नाही.पाणी सोडण्याचे ठराविक वेळापत्रक तयार कराअंबाजोगाई शहराला होणाºया अनियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरवासियांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाने पाणी सोडण्याची वेळ नागरिकांना ठरवून दिली तर गैरसोय दूर होईल, यासाठी पाणी सोडण्याचे वेळापत्रक बंधनकारक करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुलभा सोळंके यांनी केली आहे.पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी रस्त्यावर खड्डे कायमअंबाजोगाई शहरातील अनेक भागात अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने चांगले रस्ते करण्यात आले. या रस्त्याचे काम होते ना होते तो महिनाभरातच पाईपलाईनचे लिकेजेस व विविध कारणांमुळे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रस्ते खोदून ठेवले जात आहेत. हे खोदलेले रस्ते काम होताच माती ढकलून जैसे थे राहतात. आठवडाभरानंतरच या रस्त्यावर खड्डे पडू लागतात, अशी स्थिती शहरातील अनेक भागांमध्ये झाली आहे. रस्ते तयार करण्यापूर्वी अशी दुरूस्तीची कामे उरकून घेतली तर रस्त्याच्या तक्रारी कमी होतील, अशा प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईwater scarcityपाणी टंचाई