शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:56 IST

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देभावडी, दुर्गाव, नगरच्या वसंत टेकडीवरून टँकर भरणार- सुरेश धस

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नगरपंचायत मार्फत २२ टँकरद्वारे आष्टी शहराला पाणीपुरवठा होत आहे. पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागात ७१ तर पाटोदा नगरपंचायतला २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात ११० टँकरद्वारे तर नगरपंचायतला ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी, बाळेवाडी, ठोंबळ सांगवी या ठिकाणच्या तक्रारींमुळे टँकर बद्दल करून दिले आहेत. उकंडा प्रकल्पात बोडक्या घेतल्या होत्या तेथे आणखी पाच विहिरी सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील गढूळ पाण्याचा प्रश्न दोन दिवसात सुटणार आहे. आष्टी पंचायत समितीला १०, पाटोदा पंचायत समिती ५ आणि शिरूर पं.स. ला ५ स्टँडबाय टँकर देण्याचे आदेश दिल्याचेही आ. धस यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसांत आष्टी तालुक्यातील ५० वस्ती, रस्ते आणि शिरूर तालुक्यातील २५ व पाटोदा तालुक्यातील २५ वस्ती रस्ते सुरू होतील. तसेच रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे धस यांनी सांगितले.आष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकर भरण्याची परवानगी मागितली असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचेही आ. धस म्हणाले.आष्टीचे विद्यमान आ.भीमराव धोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आष्टीच्या तहसील कार्यालयात दुष्काळी आढावा बैठक घेऊन भीषण पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तर दुसऱ्याच दिवशी आ. सुरेश धस यांनी प्रशासनाची बाजू पत्रकार परिषदेतून लावून धरल्याने आगामी काळात या ठिकाणी राजकीय संघर्ष अटळ असल्याचे जाणवते आहे.अहमदनगर जिल्ह्यातून येणार पाणीआष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे.त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकरची भरण्याची परवानगी मागितली आहे.प्रशासन जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी आ. सुरेश धस म्हणाले. सध्या या तीन तालुक्यात पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, पाणीटंचाईने उग्ररुप धारण केलेले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईSuresh Dhasसुरेश धस