शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:56 IST

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देभावडी, दुर्गाव, नगरच्या वसंत टेकडीवरून टँकर भरणार- सुरेश धस

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नगरपंचायत मार्फत २२ टँकरद्वारे आष्टी शहराला पाणीपुरवठा होत आहे. पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागात ७१ तर पाटोदा नगरपंचायतला २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात ११० टँकरद्वारे तर नगरपंचायतला ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी, बाळेवाडी, ठोंबळ सांगवी या ठिकाणच्या तक्रारींमुळे टँकर बद्दल करून दिले आहेत. उकंडा प्रकल्पात बोडक्या घेतल्या होत्या तेथे आणखी पाच विहिरी सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील गढूळ पाण्याचा प्रश्न दोन दिवसात सुटणार आहे. आष्टी पंचायत समितीला १०, पाटोदा पंचायत समिती ५ आणि शिरूर पं.स. ला ५ स्टँडबाय टँकर देण्याचे आदेश दिल्याचेही आ. धस यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसांत आष्टी तालुक्यातील ५० वस्ती, रस्ते आणि शिरूर तालुक्यातील २५ व पाटोदा तालुक्यातील २५ वस्ती रस्ते सुरू होतील. तसेच रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे धस यांनी सांगितले.आष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकर भरण्याची परवानगी मागितली असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचेही आ. धस म्हणाले.आष्टीचे विद्यमान आ.भीमराव धोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आष्टीच्या तहसील कार्यालयात दुष्काळी आढावा बैठक घेऊन भीषण पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तर दुसऱ्याच दिवशी आ. सुरेश धस यांनी प्रशासनाची बाजू पत्रकार परिषदेतून लावून धरल्याने आगामी काळात या ठिकाणी राजकीय संघर्ष अटळ असल्याचे जाणवते आहे.अहमदनगर जिल्ह्यातून येणार पाणीआष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे.त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकरची भरण्याची परवानगी मागितली आहे.प्रशासन जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी आ. सुरेश धस म्हणाले. सध्या या तीन तालुक्यात पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, पाणीटंचाईने उग्ररुप धारण केलेले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईSuresh Dhasसुरेश धस