शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:56 IST

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देभावडी, दुर्गाव, नगरच्या वसंत टेकडीवरून टँकर भरणार- सुरेश धस

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नगरपंचायत मार्फत २२ टँकरद्वारे आष्टी शहराला पाणीपुरवठा होत आहे. पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागात ७१ तर पाटोदा नगरपंचायतला २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात ११० टँकरद्वारे तर नगरपंचायतला ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी, बाळेवाडी, ठोंबळ सांगवी या ठिकाणच्या तक्रारींमुळे टँकर बद्दल करून दिले आहेत. उकंडा प्रकल्पात बोडक्या घेतल्या होत्या तेथे आणखी पाच विहिरी सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील गढूळ पाण्याचा प्रश्न दोन दिवसात सुटणार आहे. आष्टी पंचायत समितीला १०, पाटोदा पंचायत समिती ५ आणि शिरूर पं.स. ला ५ स्टँडबाय टँकर देण्याचे आदेश दिल्याचेही आ. धस यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसांत आष्टी तालुक्यातील ५० वस्ती, रस्ते आणि शिरूर तालुक्यातील २५ व पाटोदा तालुक्यातील २५ वस्ती रस्ते सुरू होतील. तसेच रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे धस यांनी सांगितले.आष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकर भरण्याची परवानगी मागितली असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचेही आ. धस म्हणाले.आष्टीचे विद्यमान आ.भीमराव धोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आष्टीच्या तहसील कार्यालयात दुष्काळी आढावा बैठक घेऊन भीषण पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तर दुसऱ्याच दिवशी आ. सुरेश धस यांनी प्रशासनाची बाजू पत्रकार परिषदेतून लावून धरल्याने आगामी काळात या ठिकाणी राजकीय संघर्ष अटळ असल्याचे जाणवते आहे.अहमदनगर जिल्ह्यातून येणार पाणीआष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे.त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकरची भरण्याची परवानगी मागितली आहे.प्रशासन जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी आ. सुरेश धस म्हणाले. सध्या या तीन तालुक्यात पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, पाणीटंचाईने उग्ररुप धारण केलेले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईSuresh Dhasसुरेश धस