शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:56 IST

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

ठळक मुद्देभावडी, दुर्गाव, नगरच्या वसंत टेकडीवरून टँकर भरणार- सुरेश धस

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नगरपंचायत मार्फत २२ टँकरद्वारे आष्टी शहराला पाणीपुरवठा होत आहे. पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागात ७१ तर पाटोदा नगरपंचायतला २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात ११० टँकरद्वारे तर नगरपंचायतला ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी, बाळेवाडी, ठोंबळ सांगवी या ठिकाणच्या तक्रारींमुळे टँकर बद्दल करून दिले आहेत. उकंडा प्रकल्पात बोडक्या घेतल्या होत्या तेथे आणखी पाच विहिरी सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील गढूळ पाण्याचा प्रश्न दोन दिवसात सुटणार आहे. आष्टी पंचायत समितीला १०, पाटोदा पंचायत समिती ५ आणि शिरूर पं.स. ला ५ स्टँडबाय टँकर देण्याचे आदेश दिल्याचेही आ. धस यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसांत आष्टी तालुक्यातील ५० वस्ती, रस्ते आणि शिरूर तालुक्यातील २५ व पाटोदा तालुक्यातील २५ वस्ती रस्ते सुरू होतील. तसेच रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे धस यांनी सांगितले.आष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकर भरण्याची परवानगी मागितली असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचेही आ. धस म्हणाले.आष्टीचे विद्यमान आ.भीमराव धोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आष्टीच्या तहसील कार्यालयात दुष्काळी आढावा बैठक घेऊन भीषण पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तर दुसऱ्याच दिवशी आ. सुरेश धस यांनी प्रशासनाची बाजू पत्रकार परिषदेतून लावून धरल्याने आगामी काळात या ठिकाणी राजकीय संघर्ष अटळ असल्याचे जाणवते आहे.अहमदनगर जिल्ह्यातून येणार पाणीआष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे.त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकरची भरण्याची परवानगी मागितली आहे.प्रशासन जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी आ. सुरेश धस म्हणाले. सध्या या तीन तालुक्यात पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, पाणीटंचाईने उग्ररुप धारण केलेले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईSuresh Dhasसुरेश धस