शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

अंबाजोगाई तालुक्यात ३५ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:17 IST

अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देटँकरची मागणी वाढली । ४३ गावांत १०३ विहिरी व विंधन विहीर अधिग्रहित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४३ गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. मात्र, दिवसेंदिवस जलस्त्रोत निकामी होऊ लागल्याने गावोगावी टँकरची मागणी वाढू लागली आहे.पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्याप अंबाजोगाई तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेती अत्यंत हलाखीची झाली असून खरिपाची पिके पावसाअभावी गेली. आता रबीही नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे. वर्षभरापासून पाऊस नसल्याने ठिकठिकाणचे जलस्त्रोत दिवसेंदिवस निकामी होत चालले आहेत. गावोगावी टँकरची मागणी प्रशासनाकडे वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात सध्या ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून वाडी, वस्त्या, तांडे येथे पाणीपुरवठा सुरू आहे. तर ४३ गावांमध्ये १०३ विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या अधिग्रहण केलेल्या विहिरी व इंधन विहिरींचे पाणी दरदिवशी कमी होत चालले आहे. याचा फटका गावोगावच्या ग्रामस्थांना बसू लागला आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ गावोगावच्या महिला नागरिकांवर आली आहे. मिळेल तेथून पाणी मिळवणे हा एकमेव उपक्रम सध्या ग्रामस्थ राबवित आहेत.शहरी भागातही पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा धरणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी न आल्याने धरण मृतसाठ्याकडे वाटचाल करीत आहे. तर अंबाजोगाई शहरालगत असलेला काळवटी साठवण तलावही यावर्षी भरला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा उपयोग पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावात पाणीच न आल्याने आहे हा पाणीसाठा जेमतेम दोन ते अडीच महिने अर्ध्या गावासाठी उपयुक्त ठरू शकतो. अशी भीषण स्थिती शहरातही निर्माण झाली आहे.एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईचा सामना तालुक्याला तीव्रतेने करावा लागणार आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण १०४ गावे आहेत. यापैकी ४० गावांमध्ये टँकर तर ४३ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईwater shortageपाणीकपात