शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अंबाजोगाई तालुक्यात ३५ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:17 IST

अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देटँकरची मागणी वाढली । ४३ गावांत १०३ विहिरी व विंधन विहीर अधिग्रहित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४३ गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. मात्र, दिवसेंदिवस जलस्त्रोत निकामी होऊ लागल्याने गावोगावी टँकरची मागणी वाढू लागली आहे.पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्याप अंबाजोगाई तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेती अत्यंत हलाखीची झाली असून खरिपाची पिके पावसाअभावी गेली. आता रबीही नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे. वर्षभरापासून पाऊस नसल्याने ठिकठिकाणचे जलस्त्रोत दिवसेंदिवस निकामी होत चालले आहेत. गावोगावी टँकरची मागणी प्रशासनाकडे वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात सध्या ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून वाडी, वस्त्या, तांडे येथे पाणीपुरवठा सुरू आहे. तर ४३ गावांमध्ये १०३ विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या अधिग्रहण केलेल्या विहिरी व इंधन विहिरींचे पाणी दरदिवशी कमी होत चालले आहे. याचा फटका गावोगावच्या ग्रामस्थांना बसू लागला आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ गावोगावच्या महिला नागरिकांवर आली आहे. मिळेल तेथून पाणी मिळवणे हा एकमेव उपक्रम सध्या ग्रामस्थ राबवित आहेत.शहरी भागातही पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा धरणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी न आल्याने धरण मृतसाठ्याकडे वाटचाल करीत आहे. तर अंबाजोगाई शहरालगत असलेला काळवटी साठवण तलावही यावर्षी भरला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा उपयोग पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावात पाणीच न आल्याने आहे हा पाणीसाठा जेमतेम दोन ते अडीच महिने अर्ध्या गावासाठी उपयुक्त ठरू शकतो. अशी भीषण स्थिती शहरातही निर्माण झाली आहे.एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईचा सामना तालुक्याला तीव्रतेने करावा लागणार आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण १०४ गावे आहेत. यापैकी ४० गावांमध्ये टँकर तर ४३ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईwater shortageपाणीकपात