शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यात ३५ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:17 IST

अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देटँकरची मागणी वाढली । ४३ गावांत १०३ विहिरी व विंधन विहीर अधिग्रहित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईने ग्रासले असून दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. तालुक्यात ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून चाळीस गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४३ गावांमध्ये विहिरी व इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. मात्र, दिवसेंदिवस जलस्त्रोत निकामी होऊ लागल्याने गावोगावी टँकरची मागणी वाढू लागली आहे.पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्याप अंबाजोगाई तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेती अत्यंत हलाखीची झाली असून खरिपाची पिके पावसाअभावी गेली. आता रबीही नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे. वर्षभरापासून पाऊस नसल्याने ठिकठिकाणचे जलस्त्रोत दिवसेंदिवस निकामी होत चालले आहेत. गावोगावी टँकरची मागणी प्रशासनाकडे वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात सध्या ३५ टँकरद्वारे १३१ खेपा करून वाडी, वस्त्या, तांडे येथे पाणीपुरवठा सुरू आहे. तर ४३ गावांमध्ये १०३ विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या अधिग्रहण केलेल्या विहिरी व इंधन विहिरींचे पाणी दरदिवशी कमी होत चालले आहे. याचा फटका गावोगावच्या ग्रामस्थांना बसू लागला आहे. भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ गावोगावच्या महिला नागरिकांवर आली आहे. मिळेल तेथून पाणी मिळवणे हा एकमेव उपक्रम सध्या ग्रामस्थ राबवित आहेत.शहरी भागातही पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा धरणात गेल्या तीन वर्षांपासून पाणी न आल्याने धरण मृतसाठ्याकडे वाटचाल करीत आहे. तर अंबाजोगाई शहरालगत असलेला काळवटी साठवण तलावही यावर्षी भरला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा उपयोग पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावात पाणीच न आल्याने आहे हा पाणीसाठा जेमतेम दोन ते अडीच महिने अर्ध्या गावासाठी उपयुक्त ठरू शकतो. अशी भीषण स्थिती शहरातही निर्माण झाली आहे.एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईचा सामना तालुक्याला तीव्रतेने करावा लागणार आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण १०४ गावे आहेत. यापैकी ४० गावांमध्ये टँकर तर ४३ गावांमध्ये विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईwater shortageपाणीकपात