शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘भूगर्भातून उपसा केलेल्या पाण्याचे पुनर्भरण गरजेचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:32 IST

पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

ठळक मुद्देअंबाजोगाईत राष्ट्रीय पाणी परिषद : महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती; राजेंद्रसिंह राणा यांचे मार्गदर्शन

अंबाजोगाई : पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.येथील मानवलोक येथे राजेंद्र राणा यांच्या दुष्काळमुक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ तसेच राष्ट्रीय पाणी परिषदेचे उद्घाटन राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी यशदाचे डॉ. सुमंत पांडे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, वनराईचे किशोर धारिया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सुनिताजी (दिल्ली), डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अरूंधती पाटील यांची उपस्थिती होती.या पाणी परिषदेत वाढता दुष्काळ, बदलते हवामान, भूगर्भातील घटलेली पाणीपातळी, वृक्षारोपण, लोकसहभागातून पुनर्भरणासाठी करावयाची कामे, दुष्काळी स्थितीत सामाजिक संस्थांकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना करण्यात येणारी मदत अशा विविध बाबींवर चर्चा झाली. डॉ.सुमंत पांडे, सुनिताजी, अरविंद कर्वे, रुपाली ठोंबरे, पांडुरंग साबळे, राजेश पंडित, रमेश भिसे, चंदू बडवाई, जयाजी पाईकराव, प्रकाश पाटील, नरेंद्र चुंग, डॉ. नरेंद्र काळे आदींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. तसेच मराठवाड्यात ८२ टक्के खडक हा जमिनीतील पाणी मुरवण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा अहवाल डॉ. अशोक तेजानकर यांनी मांडला. पाणी बचतीसाठी करण्यात येणाऱ्या विविध योजनांची चर्चा या परिषदेत झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते एका माठात पाणी सोडून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पृथ्वीचे जलपुनर्भरण ही संकल्पना यावेळी मांडण्यात आली.प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अनिकेत लोहिया यांनी केले. संचालन प्रा. किशन शिनगारे यांनी केले. आभार हनुमंत साळुंके यांनी मानले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई