शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘भूगर्भातून उपसा केलेल्या पाण्याचे पुनर्भरण गरजेचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:32 IST

पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

ठळक मुद्देअंबाजोगाईत राष्ट्रीय पाणी परिषद : महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती; राजेंद्रसिंह राणा यांचे मार्गदर्शन

अंबाजोगाई : पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे तापमान कमी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी परत आणण्यासाठी वृक्षारोपण व भूगर्भातील उपसा झालेल्या पाण्याचे पुनर्भरण झाले तरच तापमानातील समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.येथील मानवलोक येथे राजेंद्र राणा यांच्या दुष्काळमुक्ती संवाद यात्रेचा प्रारंभ तसेच राष्ट्रीय पाणी परिषदेचे उद्घाटन राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी यशदाचे डॉ. सुमंत पांडे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, वनराईचे किशोर धारिया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सुनिताजी (दिल्ली), डॉ. प्रकाश जाधव, डॉ. अरूंधती पाटील यांची उपस्थिती होती.या पाणी परिषदेत वाढता दुष्काळ, बदलते हवामान, भूगर्भातील घटलेली पाणीपातळी, वृक्षारोपण, लोकसहभागातून पुनर्भरणासाठी करावयाची कामे, दुष्काळी स्थितीत सामाजिक संस्थांकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना करण्यात येणारी मदत अशा विविध बाबींवर चर्चा झाली. डॉ.सुमंत पांडे, सुनिताजी, अरविंद कर्वे, रुपाली ठोंबरे, पांडुरंग साबळे, राजेश पंडित, रमेश भिसे, चंदू बडवाई, जयाजी पाईकराव, प्रकाश पाटील, नरेंद्र चुंग, डॉ. नरेंद्र काळे आदींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. तसेच मराठवाड्यात ८२ टक्के खडक हा जमिनीतील पाणी मुरवण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा अहवाल डॉ. अशोक तेजानकर यांनी मांडला. पाणी बचतीसाठी करण्यात येणाऱ्या विविध योजनांची चर्चा या परिषदेत झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते एका माठात पाणी सोडून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पृथ्वीचे जलपुनर्भरण ही संकल्पना यावेळी मांडण्यात आली.प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अनिकेत लोहिया यांनी केले. संचालन प्रा. किशन शिनगारे यांनी केले. आभार हनुमंत साळुंके यांनी मानले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई