शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा ...

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा पर्यावरण आणि जीवसृष्टीवर जीवघेणा परिणाम होतो आहे. कचरा व्यवस्थापनासाठी थ्री आर (रिड्यूज, रेफ्यूज, रिसायकल) सूत्राचा वापर जागरूकतेने करावा, कारण कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ज्यातून स्वच्छ, सुंदर, निरोगी पृथ्वीची निर्मिती होऊ शकते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक दत्ता पत्की यांनी दिली. दीनदयाल शोध संस्थान संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा वित्त पोषित जनशिक्षण संस्थान, बीडद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ताकडगाव येथे ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, एका बाटलीमध्ये किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळाएवढ्या कॅरिबॅग मावतात. त्या विटांचा आपण शोभिवंत कामासाठी उपयोग करू शकतो. त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित लाभार्थींनी प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता गिरी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर जनशिक्षण संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख, प्रमुख पाहुणे दत्ता पत्की, उपसरपंच विद्या मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगाधर देशमुख यांनी व्यवसाय कौशल्यातून स्वयंरोजगारनिर्मितीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्रिंबक मोटे, नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सीमा मनूरकर यांनी केले. अनुजा मिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षिका रुक्मिणी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

210721\2129sakharam shinde_img-20210721-wa0010_14.jpg