शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा ...

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा पर्यावरण आणि जीवसृष्टीवर जीवघेणा परिणाम होतो आहे. कचरा व्यवस्थापनासाठी थ्री आर (रिड्यूज, रेफ्यूज, रिसायकल) सूत्राचा वापर जागरूकतेने करावा, कारण कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ज्यातून स्वच्छ, सुंदर, निरोगी पृथ्वीची निर्मिती होऊ शकते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक दत्ता पत्की यांनी दिली. दीनदयाल शोध संस्थान संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा वित्त पोषित जनशिक्षण संस्थान, बीडद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ताकडगाव येथे ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, एका बाटलीमध्ये किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळाएवढ्या कॅरिबॅग मावतात. त्या विटांचा आपण शोभिवंत कामासाठी उपयोग करू शकतो. त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित लाभार्थींनी प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता गिरी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर जनशिक्षण संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख, प्रमुख पाहुणे दत्ता पत्की, उपसरपंच विद्या मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगाधर देशमुख यांनी व्यवसाय कौशल्यातून स्वयंरोजगारनिर्मितीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्रिंबक मोटे, नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सीमा मनूरकर यांनी केले. अनुजा मिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षिका रुक्मिणी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

210721\2129sakharam shinde_img-20210721-wa0010_14.jpg