शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा ...

गेवराई : दरवर्षी आपल्या देशात कोट्यवधी टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे तो वाढत जातो. ज्याचा पर्यावरण आणि जीवसृष्टीवर जीवघेणा परिणाम होतो आहे. कचरा व्यवस्थापनासाठी थ्री आर (रिड्यूज, रेफ्यूज, रिसायकल) सूत्राचा वापर जागरूकतेने करावा, कारण कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ज्यातून स्वच्छ, सुंदर, निरोगी पृथ्वीची निर्मिती होऊ शकते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक दत्ता पत्की यांनी दिली. दीनदयाल शोध संस्थान संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा वित्त पोषित जनशिक्षण संस्थान, बीडद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ताकडगाव येथे ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, एका बाटलीमध्ये किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळाएवढ्या कॅरिबॅग मावतात. त्या विटांचा आपण शोभिवंत कामासाठी उपयोग करू शकतो. त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. उपस्थित लाभार्थींनी प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता गिरी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यासपीठावर जनशिक्षण संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख, प्रमुख पाहुणे दत्ता पत्की, उपसरपंच विद्या मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगाधर देशमुख यांनी व्यवसाय कौशल्यातून स्वयंरोजगारनिर्मितीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्रिंबक मोटे, नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सीमा मनूरकर यांनी केले. अनुजा मिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षिका रुक्मिणी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

210721\2129sakharam shinde_img-20210721-wa0010_14.jpg