शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

योजनेचे पाणी वापरले वाळू धुण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:34 IST

तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देदुष्काळात पाण्याची नासाडी : सरपंच म्हणतात, पाईपलाईन फुटली

आष्टी : तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळजन्य स्थितीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना पिण्याच्या पाण्याची नासाडी करण्याचा हा प्रकार प्रशासनाच्या दरबारात पोहोचला आहे.टाकळी अमिया या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो मात्र याच टाकीच्या पाण्यातून गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाळू धुतल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. रविवारी सकाळी गावकरी पाण्याच्या टाकीजवळ गेल्यानंतर हा प्रकार पहायला मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात सरपंचाने वाळू धुतली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय टाकळी यांनी गावातील सर्व जनतेकडून पंधराशे रु पये नळपट्टी गोळा केली आहे तरी या नळपट्टीची लेखी पावती कोणालाही दिली गेलेली नाही आणि जनतेच्या पाण्याचा गैरवापर सरपंच व त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप ग्रामस्थ अशोक हनुमंत चौधरी यांनी केला आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी सचिन एकशिंगे, सखाराम ससाणे, राजेंद्र ससाणे , अशोक एकशिंगे, किरण चौधरी, काकासाहेब भवर , आमोल शितोळे, दादा पाटील चौधरी, उध्दव ससाणे, कचरु भुकन, महेश साबळे, अजहर पठाण, विकास कर्डीले, बंटी काकडे, रामदास काका चौधरी, मोहन भागडे, श्रीमंत चौधरी आदींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.ग्रामस्थांचे पाणी पळविले : कारवाई कराव्हिडिओ क्लीपमध्ये पाण्याच्या टाकी परिसरात पाणी दिसत आहे हे मान्य आहे, मात्र हे पाणी पाईपलाईन फुटल्यामुळे साचले असल्याचे टाकळीचे सरपंच सावता ससाणे यांनी सांगितले.अवैध वाळू उपसा करायचा आणि गावक-यांच्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करायचा प्रकार हा अनेक दिवसांपासून सुरु असून याबाबत सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या गावचे रहिवासी अण्णासाहेब चौधरी यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई