शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

योजनेचे पाणी वापरले वाळू धुण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:34 IST

तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देदुष्काळात पाण्याची नासाडी : सरपंच म्हणतात, पाईपलाईन फुटली

आष्टी : तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळजन्य स्थितीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना पिण्याच्या पाण्याची नासाडी करण्याचा हा प्रकार प्रशासनाच्या दरबारात पोहोचला आहे.टाकळी अमिया या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो मात्र याच टाकीच्या पाण्यातून गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाळू धुतल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. रविवारी सकाळी गावकरी पाण्याच्या टाकीजवळ गेल्यानंतर हा प्रकार पहायला मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात सरपंचाने वाळू धुतली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय टाकळी यांनी गावातील सर्व जनतेकडून पंधराशे रु पये नळपट्टी गोळा केली आहे तरी या नळपट्टीची लेखी पावती कोणालाही दिली गेलेली नाही आणि जनतेच्या पाण्याचा गैरवापर सरपंच व त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप ग्रामस्थ अशोक हनुमंत चौधरी यांनी केला आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी सचिन एकशिंगे, सखाराम ससाणे, राजेंद्र ससाणे , अशोक एकशिंगे, किरण चौधरी, काकासाहेब भवर , आमोल शितोळे, दादा पाटील चौधरी, उध्दव ससाणे, कचरु भुकन, महेश साबळे, अजहर पठाण, विकास कर्डीले, बंटी काकडे, रामदास काका चौधरी, मोहन भागडे, श्रीमंत चौधरी आदींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.ग्रामस्थांचे पाणी पळविले : कारवाई कराव्हिडिओ क्लीपमध्ये पाण्याच्या टाकी परिसरात पाणी दिसत आहे हे मान्य आहे, मात्र हे पाणी पाईपलाईन फुटल्यामुळे साचले असल्याचे टाकळीचे सरपंच सावता ससाणे यांनी सांगितले.अवैध वाळू उपसा करायचा आणि गावक-यांच्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करायचा प्रकार हा अनेक दिवसांपासून सुरु असून याबाबत सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या गावचे रहिवासी अण्णासाहेब चौधरी यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई