शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे पाणी वापरले वाळू धुण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:34 IST

तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देदुष्काळात पाण्याची नासाडी : सरपंच म्हणतात, पाईपलाईन फुटली

आष्टी : तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी पाणीपुरवठा योजनेतील पाणी गावासाठी न वापरता त्या पाण्याने वाळू धुतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी गावक-यांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन साचलेल्या पाण्याचा व्हीडिओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळजन्य स्थितीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना पिण्याच्या पाण्याची नासाडी करण्याचा हा प्रकार प्रशासनाच्या दरबारात पोहोचला आहे.टाकळी अमिया या गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो मात्र याच टाकीच्या पाण्यातून गावातील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाळू धुतल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. रविवारी सकाळी गावकरी पाण्याच्या टाकीजवळ गेल्यानंतर हा प्रकार पहायला मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात सरपंचाने वाळू धुतली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत कार्यालय टाकळी यांनी गावातील सर्व जनतेकडून पंधराशे रु पये नळपट्टी गोळा केली आहे तरी या नळपट्टीची लेखी पावती कोणालाही दिली गेलेली नाही आणि जनतेच्या पाण्याचा गैरवापर सरपंच व त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप ग्रामस्थ अशोक हनुमंत चौधरी यांनी केला आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी सचिन एकशिंगे, सखाराम ससाणे, राजेंद्र ससाणे , अशोक एकशिंगे, किरण चौधरी, काकासाहेब भवर , आमोल शितोळे, दादा पाटील चौधरी, उध्दव ससाणे, कचरु भुकन, महेश साबळे, अजहर पठाण, विकास कर्डीले, बंटी काकडे, रामदास काका चौधरी, मोहन भागडे, श्रीमंत चौधरी आदींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.ग्रामस्थांचे पाणी पळविले : कारवाई कराव्हिडिओ क्लीपमध्ये पाण्याच्या टाकी परिसरात पाणी दिसत आहे हे मान्य आहे, मात्र हे पाणी पाईपलाईन फुटल्यामुळे साचले असल्याचे टाकळीचे सरपंच सावता ससाणे यांनी सांगितले.अवैध वाळू उपसा करायचा आणि गावक-यांच्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करायचा प्रकार हा अनेक दिवसांपासून सुरु असून याबाबत सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या गावचे रहिवासी अण्णासाहेब चौधरी यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई