शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

चिखल तुडवत जिल्हाधिकारी पोहचले बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे विविध भागात शेती व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाला पंचनामे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे विविध भागात शेती व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत.

रविवारी सायंकाळपर्यंत बीड तालुक्यातील अनेक गावांमधील शेतशिवारांना शर्मा यांंनी भेट देऊन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. या अतिवृष्टीमुळे लहान मोठे बंधारे व तलाव फुटल्यामुळे शेतात पाणी शिरल्यानेदेखील नुकसान झाले आहे. तालुक्यातील कुर्ला शिवारातून येथून सिंदफणा नदीचा प्रवाह आहे. या नदीवर बंधारा आहे. औरंगपूर येथील हा बंधारा ४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री भिंतलगत मातीभराव फुटल्याने नदीचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे शेतातली माती वाहून गेली आहे. याठिकाणी रविवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी याठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, बीडचे तहसीलदार शिरीष वमने, जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित परांडे यांच्यासह इतर अधिकारी या पाहणी दौऱ्यात होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तत्काळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी केली.

....

फेरपंचनामे करण्याचे आदेश

ज्याठिकाणी ३१ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे केले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने नदीचा प्रवाह बदलला आहे. शेतात पाणी शिरल्याने शेतातील मातीसह पिके वाहून गेली आहेत. या सर्वांचे पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत.

120921\12_2_bed_16_12092021_14.jpg~120921\12_2_bed_15_12092021_14.jpg

सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ~नदीच्या पाण्यामुळे वाहून गेलेल्या शेतात पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांचे पथक