शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बीडमध्ये बोंडअळी अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:23 IST

बीड : गेल्या हंगामी वर्षात कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने २५६ कोटी अनुदान देखील जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. परंतु आज देखील अनेक शेतकरी दुसºया टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.खरीप ...

बीड : गेल्या हंगामी वर्षात कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने २५६ कोटी अनुदान देखील जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. परंतु आज देखील अनेक शेतकरी दुसºया टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

खरीप हंगाम पेरणी, लागवडीपूर्वी बोंडअळीचे अनुदान मिळावे अशी मागणी शेतकºयांनी वेळोवेळी शासनाकडे केली होती. परंतू खरीप पेरणी व या हंगामातील कापूस लागवड झाल्यानंतर देखील शासनाकडून दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रक्कम देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शासनाने जिल्ह्यातील बोंडअळी बाधित शेतकºयांना २५६ कोटी अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यासाठी ८५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी ६८ कोटी ४२ लक्ष रूपये शासनाने मंजूर केले होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील सर्व रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम देखील धिम्या गतीने सुरू असल्याचे शेतकºयांकडून सांगण्याता आले. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रकमेची मागणी जिल्हा शासनाच्या वतीने ८५ कोटी रूपये करण्यात आली आहे. परंतु ही अनुदानाची रक्कम राज्य शासनाने आणखी मंजूर न केल्यामुळे बोंडअळी बाधीत शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बोंडअळीचे अनुदान राज्य शासनाने तात्काळ मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी शेतकºयामधून जोर धरू लागली आहे.६८ कोटींवरच केली बोळवणबोंडअळीबाधित शेतकºयांना अनुदानापोटी २५६ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी ३ टप्प्यात रक्कमेची मागणी केली होती. मात्र पहिल्या टप्प्यात ८५ कोटी रूपयांची मागणी करून देखील ६८.४८ कोटी रक्कम जिल्ह्याला देण्यात आले. उर्वरीत रक्कम मिळणार आहे का नाही असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारू लागले आहेत.