शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बीडमध्ये बोंडअळी अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:23 IST

बीड : गेल्या हंगामी वर्षात कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने २५६ कोटी अनुदान देखील जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. परंतु आज देखील अनेक शेतकरी दुसºया टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.खरीप ...

बीड : गेल्या हंगामी वर्षात कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने २५६ कोटी अनुदान देखील जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. परंतु आज देखील अनेक शेतकरी दुसºया टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

खरीप हंगाम पेरणी, लागवडीपूर्वी बोंडअळीचे अनुदान मिळावे अशी मागणी शेतकºयांनी वेळोवेळी शासनाकडे केली होती. परंतू खरीप पेरणी व या हंगामातील कापूस लागवड झाल्यानंतर देखील शासनाकडून दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रक्कम देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शासनाने जिल्ह्यातील बोंडअळी बाधित शेतकºयांना २५६ कोटी अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यासाठी ८५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी ६८ कोटी ४२ लक्ष रूपये शासनाने मंजूर केले होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील सर्व रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम देखील धिम्या गतीने सुरू असल्याचे शेतकºयांकडून सांगण्याता आले. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रकमेची मागणी जिल्हा शासनाच्या वतीने ८५ कोटी रूपये करण्यात आली आहे. परंतु ही अनुदानाची रक्कम राज्य शासनाने आणखी मंजूर न केल्यामुळे बोंडअळी बाधीत शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बोंडअळीचे अनुदान राज्य शासनाने तात्काळ मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी शेतकºयामधून जोर धरू लागली आहे.६८ कोटींवरच केली बोळवणबोंडअळीबाधित शेतकºयांना अनुदानापोटी २५६ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी ३ टप्प्यात रक्कमेची मागणी केली होती. मात्र पहिल्या टप्प्यात ८५ कोटी रूपयांची मागणी करून देखील ६८.४८ कोटी रक्कम जिल्ह्याला देण्यात आले. उर्वरीत रक्कम मिळणार आहे का नाही असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारू लागले आहेत.