शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बोंडअळी अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:23 IST

बीड : गेल्या हंगामी वर्षात कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने २५६ कोटी अनुदान देखील जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. परंतु आज देखील अनेक शेतकरी दुसºया टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.खरीप ...

बीड : गेल्या हंगामी वर्षात कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने २५६ कोटी अनुदान देखील जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. परंतु आज देखील अनेक शेतकरी दुसºया टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

खरीप हंगाम पेरणी, लागवडीपूर्वी बोंडअळीचे अनुदान मिळावे अशी मागणी शेतकºयांनी वेळोवेळी शासनाकडे केली होती. परंतू खरीप पेरणी व या हंगामातील कापूस लागवड झाल्यानंतर देखील शासनाकडून दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रक्कम देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शासनाने जिल्ह्यातील बोंडअळी बाधित शेतकºयांना २५६ कोटी अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यासाठी ८५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी ६८ कोटी ४२ लक्ष रूपये शासनाने मंजूर केले होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील सर्व रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम देखील धिम्या गतीने सुरू असल्याचे शेतकºयांकडून सांगण्याता आले. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

दुसºया टप्प्यातील बोंडअळी अनुदान रकमेची मागणी जिल्हा शासनाच्या वतीने ८५ कोटी रूपये करण्यात आली आहे. परंतु ही अनुदानाची रक्कम राज्य शासनाने आणखी मंजूर न केल्यामुळे बोंडअळी बाधीत शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बोंडअळीचे अनुदान राज्य शासनाने तात्काळ मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी शेतकºयामधून जोर धरू लागली आहे.६८ कोटींवरच केली बोळवणबोंडअळीबाधित शेतकºयांना अनुदानापोटी २५६ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी ३ टप्प्यात रक्कमेची मागणी केली होती. मात्र पहिल्या टप्प्यात ८५ कोटी रूपयांची मागणी करून देखील ६८.४८ कोटी रक्कम जिल्ह्याला देण्यात आले. उर्वरीत रक्कम मिळणार आहे का नाही असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी विचारू लागले आहेत.