शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थ उपोषणावर ठाम; सरकारला २५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:25 IST

मस्साजोग ग्रामस्थांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टीमेटम; २५ पासून उपोषणावर ठाम

केज ( बीड) : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी प्रशासनासमोर ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास देशमुख कुटुंबियांसह समस्थ गावकरी दि. 25 फेब्रुवारी पासून उपोषणावर ठाम आहेत. उपोषणापासून गावकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी आलेल्या मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गावाकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवीला आहे. दरम्यान, उपोषण टाळायचे असेल तर चार दिवसांत सर्व मागण्या मान्य करा, असा अल्टीमेटम ग्रामस्थांनी आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर प्रशासनास दिला. 

मनोज जरांगे पाटील यानी आज सकाळी ११ वाजता मस्साजोग येथे देशमुख कुटुंबिय आणि समस्त गावकऱ्यांची भेट घेतली. उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी जरांगे यांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांसोबत तब्बल २ तास सर्वांशी संवाद साधला. गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी मदत करणारे पोलीस कर्मचारी- अधिकारी आणि आसरा, गाड्या आणि पैसा पुरविणाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग आढळूनही अनेक जणांना सहआरोपी करण्यात आले नाही, याबाबत मनोज जरांगे पाटील आणि ग्रामस्थांनी नापसंती व्यक्त केली. तसेच प्रशासनाच्यावतीने देशमुख कुटुंबियांची एखाद्या मंत्र्यांनी भेट घ्यावी. त्यांना आधार आणि विश्वास द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचा डाव उधळला...सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची क्रूरपणे हत्या केल्या नंतर त्यांना बदनाम करुन कळंब येथील एका महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी त्यांची हत्या झाली अशी दिशाभूल व हुलकवानी या प्रकरणाला देण्याची पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचे पार्थिव असलेली जीप कळंब रस्त्याने वळवीली होती. या जीप मधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सीडीआर काढून त्यांना सहआरोपी केले पाहिजे. कळंब येथील ती महिला कोण. हे ही जनतेसमोर आले पाहिजे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे भूमिका मांडली.

200 हून अधिक सह आरोपी आहेत...मनोज जरांगेपाटील, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि समस्त गावकरी यांनी  गुन्हेगारांना या प्रकरणी 50 पोलीस व अधिकाऱ्यांसह 200 हून अधिक लोकांनी विविध प्रकारचे सहकार्य केले आहे. या सर्वांना सहआरोपी करुन त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या मागणीवर सर्वजण ठाम आहेत.

सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वांचा 100 टक्के विश्वास होता. परंतु विविध चौकशी समित्या नेमण्याशिवाय त्यांनी या प्रकरणी काहीही केलेले नाही. त्यांनी आदेश दिल्यानंतर 50 पोलिसांसह 200 हून अधिक सह आरोपीवर कारवाई होईल असे वाटले होते. परंतु या प्रकरणांशी संबंधित मंत्री धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री मंडळात आहेत. तोपर्यंत सहआरोपीवर कारवाई होऊ शकत नाही. त्यासाठी धनंजय देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतरच या प्रकरणी आपल्याला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. गुंड पोसायचे, सांभाळायचे त्यांना अभय द्यायचे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, अशा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

या मागण्यांवर ठाम: केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सह आरोपी करा. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा. अॅड. उज्वल निकम यांची या प्रकरणी नियुक्ती करुन हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे. सर्व आरोपी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे सीडीआर तपासून दोषींना सहआरोपी करा. या मागण्यांवर गावकरी ठाम असून त्यासाठी सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील