शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थ उपोषणावर ठाम; सरकारला २५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:25 IST

मस्साजोग ग्रामस्थांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टीमेटम; २५ पासून उपोषणावर ठाम

केज ( बीड) : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी प्रशासनासमोर ठेवलेल्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास देशमुख कुटुंबियांसह समस्थ गावकरी दि. 25 फेब्रुवारी पासून उपोषणावर ठाम आहेत. उपोषणापासून गावकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी आलेल्या मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गावाकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवीला आहे. दरम्यान, उपोषण टाळायचे असेल तर चार दिवसांत सर्व मागण्या मान्य करा, असा अल्टीमेटम ग्रामस्थांनी आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर प्रशासनास दिला. 

मनोज जरांगे पाटील यानी आज सकाळी ११ वाजता मस्साजोग येथे देशमुख कुटुंबिय आणि समस्त गावकऱ्यांची भेट घेतली. उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी जरांगे यांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांसोबत तब्बल २ तास सर्वांशी संवाद साधला. गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी मदत करणारे पोलीस कर्मचारी- अधिकारी आणि आसरा, गाड्या आणि पैसा पुरविणाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग आढळूनही अनेक जणांना सहआरोपी करण्यात आले नाही, याबाबत मनोज जरांगे पाटील आणि ग्रामस्थांनी नापसंती व्यक्त केली. तसेच प्रशासनाच्यावतीने देशमुख कुटुंबियांची एखाद्या मंत्र्यांनी भेट घ्यावी. त्यांना आधार आणि विश्वास द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचा डाव उधळला...सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची क्रूरपणे हत्या केल्या नंतर त्यांना बदनाम करुन कळंब येथील एका महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी त्यांची हत्या झाली अशी दिशाभूल व हुलकवानी या प्रकरणाला देण्याची पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचे पार्थिव असलेली जीप कळंब रस्त्याने वळवीली होती. या जीप मधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सीडीआर काढून त्यांना सहआरोपी केले पाहिजे. कळंब येथील ती महिला कोण. हे ही जनतेसमोर आले पाहिजे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे भूमिका मांडली.

200 हून अधिक सह आरोपी आहेत...मनोज जरांगेपाटील, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि समस्त गावकरी यांनी  गुन्हेगारांना या प्रकरणी 50 पोलीस व अधिकाऱ्यांसह 200 हून अधिक लोकांनी विविध प्रकारचे सहकार्य केले आहे. या सर्वांना सहआरोपी करुन त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या मागणीवर सर्वजण ठाम आहेत.

सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वांचा 100 टक्के विश्वास होता. परंतु विविध चौकशी समित्या नेमण्याशिवाय त्यांनी या प्रकरणी काहीही केलेले नाही. त्यांनी आदेश दिल्यानंतर 50 पोलिसांसह 200 हून अधिक सह आरोपीवर कारवाई होईल असे वाटले होते. परंतु या प्रकरणांशी संबंधित मंत्री धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री मंडळात आहेत. तोपर्यंत सहआरोपीवर कारवाई होऊ शकत नाही. त्यासाठी धनंजय देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतरच या प्रकरणी आपल्याला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. गुंड पोसायचे, सांभाळायचे त्यांना अभय द्यायचे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, अशा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

या मागण्यांवर ठाम: केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सह आरोपी करा. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा. अॅड. उज्वल निकम यांची या प्रकरणी नियुक्ती करुन हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे. सर्व आरोपी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे सीडीआर तपासून दोषींना सहआरोपी करा. या मागण्यांवर गावकरी ठाम असून त्यासाठी सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील