शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका; बीड जिल्ह्यातील २४ सरपंच अन् ८२० सदस्यांचे सदस्यत्व रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:16 IST

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाई सत्र सुरूच आहे; सदस्यत्व रद्दचा काय आहे नियम?

बीड : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी २० जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात ७ तालुक्यातील १३ सरपंच, तर ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत ४ तालुक्यांतील ११ सरपंच व ४०२ सदस्यांचे सदस्यत्व ३१ जानेवारी रोजी रद्द केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढविणे व त्यातून जिंकणे हे फार मोठे यश असते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते, ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेऊन निवडून येणे हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. त्यामुळे इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत वेगळी असते. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना अनेकांकडे जात प्रमाणपत्र नसते. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारास निवडून आल्यानंतर आपले जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी एक वर्षाची मुदत असते, परंतु अनेकजणांना आपली वंशावळ व इतर कागदपत्रे सादर करता येत नाही. परिणामी जात पडताळणी वैधता प्रमाणापत्र मिळत नाही. वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अनेकांना आपले सरपंच किंवा सदस्यत्व गमावण्याची वेळ येते. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सरपंच व सदस्य अशा एकूण ८४४ जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ज्यांचे काही आक्षेप असतील त्याच्या सुनावण्या घेऊन निकाली काढण्यात येणार असल्याचे समजते.

काय आहे नियम ?अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून ते १२ महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. परंतु, २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाहीत.

पैसा व मेहनत गेली पाण्यातआजच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक लढविणे ही साधी बाब राहिली नाही. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारास पाच वर्षांपासून तयारी करावी लागते, त्यासाठी प्रत्येक गावकऱ्याच्या संपर्कात राहावे लागते. सर्वांच्या सुख-दुख:मध्ये सहभागी व्हावे लागते. वेळ प्रसंगी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून ग्रामस्थांची कामे करावी लागतात. निवडणूक लागल्यानंतर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. अशा एक ना अनेक बाबींना तोंड देऊन सदस्य निवडून येतात. परंतु, जे ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून येतात त्यांना वेळेत आपले कास्ट व्हॅलिडीटी सादर करावी लागते अन्यथा निवडून आलेल्या सदस्यत्व रद्द होत आहे. परिणामी त्यांचा पैसा व मेहनत पाण्यात जाते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCaste certificateजात प्रमाणपत्र