शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका; बीड जिल्ह्यातील २४ सरपंच अन् ८२० सदस्यांचे सदस्यत्व रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:16 IST

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाई सत्र सुरूच आहे; सदस्यत्व रद्दचा काय आहे नियम?

बीड : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी २० जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात ७ तालुक्यातील १३ सरपंच, तर ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत ४ तालुक्यांतील ११ सरपंच व ४०२ सदस्यांचे सदस्यत्व ३१ जानेवारी रोजी रद्द केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गावकारभाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढविणे व त्यातून जिंकणे हे फार मोठे यश असते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते, ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेऊन निवडून येणे हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. त्यामुळे इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत वेगळी असते. ग्रामपंचायत निवडणूक लढविताना अनेकांकडे जात प्रमाणपत्र नसते. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारास निवडून आल्यानंतर आपले जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी एक वर्षाची मुदत असते, परंतु अनेकजणांना आपली वंशावळ व इतर कागदपत्रे सादर करता येत नाही. परिणामी जात पडताळणी वैधता प्रमाणापत्र मिळत नाही. वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अनेकांना आपले सरपंच किंवा सदस्यत्व गमावण्याची वेळ येते. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सरपंच व सदस्य अशा एकूण ८४४ जणांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ज्यांचे काही आक्षेप असतील त्याच्या सुनावण्या घेऊन निकाली काढण्यात येणार असल्याचे समजते.

काय आहे नियम ?अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून ते १२ महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. परंतु, २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाहीत.

पैसा व मेहनत गेली पाण्यातआजच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक लढविणे ही साधी बाब राहिली नाही. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारास पाच वर्षांपासून तयारी करावी लागते, त्यासाठी प्रत्येक गावकऱ्याच्या संपर्कात राहावे लागते. सर्वांच्या सुख-दुख:मध्ये सहभागी व्हावे लागते. वेळ प्रसंगी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करून ग्रामस्थांची कामे करावी लागतात. निवडणूक लागल्यानंतर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. अशा एक ना अनेक बाबींना तोंड देऊन सदस्य निवडून येतात. परंतु, जे ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून येतात त्यांना वेळेत आपले कास्ट व्हॅलिडीटी सादर करावी लागते अन्यथा निवडून आलेल्या सदस्यत्व रद्द होत आहे. परिणामी त्यांचा पैसा व मेहनत पाण्यात जाते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडCaste certificateजात प्रमाणपत्र