शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

पिकांवर कीड बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रब्बी पिके बहरू लागली आहेत, परंतु या पिकांना थंडी आवश्यक असताना ...

पिकांवर कीड

बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रब्बी पिके बहरू लागली आहेत, परंतु या पिकांना थंडी आवश्यक असताना थंडी ओसरली असल्याने परिणामी पिकांवर कीड दिसत आहे.

रस्त्यांवर खड्डे वाढले

धारूर : धारूर ते आसरडोह या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे वाहनधारक वैतागले आहेत. या रस्त्याचे अंतर कापण्यासाठी ३५ ते ४० मिनिटे लागत आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

भाजीचे भाव घसरले

अंबाजोगाई : ग्रामीण भागातून भाज्यांची आवक वाढल्याने भाजी दरांमध्ये घसरण झाली आहे. टोमॅटो, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, पालेभाज्या, फळभाज्यांचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

वीज दिवसा द्या

शिरूर कासार : रब्बी हंगामातील पिकांना पूर्ण दाबाने दिवसाच वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बिबट्याची भीती अजून गेलेली नाही. महावितरणने दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खाद्यतेलाचे भाव वाढल्याने ग्राहक त्रस्त

अंबाजोगाई : खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. तसेच किराणा सामानातील वस्तूंचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांना महागाईची मोठ झळ सहन करावी लागत आहे. अचानकच सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा भरला होता. यावर्षी मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीही वाहून गेल्या. या सर्व घटनांचे पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. तरीही अद्याप शासनाकडून पीकविम्याचे वाटप करण्यात आलेले नाही. शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान समोर ठेवून खरीप हंगामातील पीक विमा लागू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.