शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अंबाजोगाईत ‘वेदनाविरहित’ प्रसुतीचा ‘स्वाराती’मध्ये प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:54 IST

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. राजश्री धाकडे यांनी एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती यशस्वी केली. बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आकारला जातो. मात्र, स्वारातीमध्ये अशी प्रसुती मोफत करण्यात येते.

ठळक मुद्देगरीब रुग्णांसाठी पद्धत ठरणार फायद्याची

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. राजश्री धाकडे यांनी एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती यशस्वी केली. बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आकारला जातो. मात्र, स्वारातीमध्ये अशी प्रसुती मोफत करण्यात येते.

सामान्य रुग्णांचे आधारकेंद्र असलेल्या येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अनस्थेशिया विभागाच्या वतीने वेदना विरहित प्रसुतीचा प्रयोग करण्यात आला. बाळंतपणात अनेक यातना महिलेस सहन कराव्या लागतात. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. वेदना विरहित प्रसुती ही नवीन उपचार पद्धती पुढे आली. हे उपचार प्रामुख्याने मुंबई, पुणे मोठ्या शहरातच होतात.

अशा प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयाकडून किमान १ लाख रुपयांपर्यंत रक्कम आकारली जाते. ही सुविधा महागडी असल्याने व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अशा प्रसुती इकडच्या होत नाहीत.

अंबाजोगाई व परिसरातील सामान्य कुटुंबातील महिला रुग्णांनाही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी येथील भूलतज्ज्ञ डॉ. अपर्णा प्रसाद कुलकर्णी व डॉ. राजश्री राहुल धाकडे यांनी विभागप्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात दाखल एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी प्रसुती यशस्वी पार पाडली.

यासाठी स्त्रीरोग व प्रसुतीविभागाचे डॉ. गणेश तोंडगे, डॉ. अपूर्वा, डॉ.वर्षा, डॉ. तेजस्विनी तर अ‍ॅनेस्थेशिया विभागाचे डॉ. रविराज, डॉ. शीतल यांनी सहकार्य केले. यशस्वी उपक्रमाबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. गणेश निकम, डॉ. प्रसाद, डॉ. प्रेरणा, डॉ. पवार, यांनी स्वागत केले आहे.वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाºया पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा विविध उपक्रमातून नवीन दिशा मिळते. तयार होणारे डॉक्टर रुग्णसेवेसाठी तरबेज होतात. अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.