शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

फळे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST

उड्डाणपुलाचे काम संथ गतीने अंबाजोगाई : अंबाजोगाई ते लातूर या मुख्य रस्त्यावर साखर कारखाना ...

उड्डाणपुलाचे काम संथ गतीने

अंबाजोगाई : अंबाजोगाई ते लातूर या मुख्य रस्त्यावर साखर कारखाना परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. अंबाजोगाई ते लातूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मोठ्या गतीने पूर्ण झाले. हा रस्ता आता सुसाट वाहनांना धावण्यासाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, या मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. या कामाला गती देऊन हे काम लवकर मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

वाहनचालकांचा विनामास्क प्रवास

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशी स्थिती असतानाही शहर व परिसरातील वाहनचालक, रिक्षाचालक, अ‍ॅटोरिक्षा, कारचालक, दुचाकी चालक, असे अनेक वाहनचालक विना मास्क प्रवास करतात. वाहनचालकांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने वारंवार देण्यात आल्या. तरीही या सूचनांकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासनाने या संदर्भात ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वीज बिलांच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात वीज बिलांबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी वापर नसतानाही अधिकची बिले वीज ग्राहकांना दिली जात आहेत. तर अनेक ठिकाणी मीटर चालू नसतानाही मोठमोठे रीडिंग दाखवून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले मिळू लागली आहेत. ही वाढती वीज बिले कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गर्दी होत आहे.

ग्रामीण भागातील भाजीपाला रस्त्यावर

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात विविध भागात पिकविला जाणारा भाजीपाला सध्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अंबाजोगाई तालुक्यातून दोन मुख्य राज्य रस्ते निर्माण झाल्याने शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला घेऊन बसत आहेत. रस्त्याने येणारे-जाणारे प्रवासी ताजा भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे शेतक-यांना हे नवीन रस्ते बाजारपेठ म्हणून उपलब्ध झाले आहेत.

निवडणूक आचारसंहितेचे पालन करा

अंबाजोगाई : अंबाजोगाई उपविभागात अंबाजोगाई व केज तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. इतरही चार दिवस विविध छाननी, उमेदवारांना चिन्ह वाटप करणे अशा प्रक्रिया सुरूच राहणार आहेत. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन ग्रामस्थांनी करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केले आहे.