शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

अवकाळीचा फटका, रब्बी पिकांसह आंबा, डाळिंब बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

आष्टी : तालुक्यात शनिवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन ...

आष्टी : तालुक्यात शनिवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेल्या डाळिंब, आंबा, द्राक्ष फळबागा वादळी वाऱ्याने अक्षरशः आडव्या झाल्या तर लगडलेल्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला. या बागांबरोबरच कांदा, गहू, मका या काढणी सुरु असलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.

तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, आंबा, डाळिंब, द्राक्षांच्या बागांमध्ये काढणीला आलेल्या फळांचा झाडाखाली खच पडला आहे. तालुक्यात कलमी आंब्याच्या, चिकूच्या बागा आहेत. द्राक्ष हंगामही अंतिम टप्प्यात आहे. या बागांना अवकाळीचा फटका बसला आहे. गहू, कांदा, हरभरा या पिकांची शेतकऱ्यांची काढणी सुरु असून, कोरोनाचे संकट असतानाच स्वच्छ असणाऱ्या आकाशात रात्रीपासून अचानक ढग दाटून आले व रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या आसपास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले. कऱ्हेवडगाव येथील राम नागरगोजे यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील छत वादळी वाऱ्याने उडून गेले. सुदैवाने अन्य कोणतीही हानी झाली नाही. आंधळेवाडी येथील कैलास आंधळे यांची ५ एकरवरील केशर आंब्याची ५०० झाडांची बाग व १२ एकरवरील डाळिंबाची ४,५०० झाडे, १ एकरवरील दोडका तसेच २२ लाखांच्या पाॅलिहाऊसचे नुकसान झाले आहे. याच परिसरातील राजेश रघुनाथ कराड, भाऊसाहेब मारुती आंधळे, रावसाहेब मारुती आंधळे, बाबासाहेब मारुती आंधळे, द्वारकाबाई मारुती आंधळे, मारुती वनाजी आंधळे यांच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे.

२५ लाखांपेक्षा जास्त नुकसान

माझ्या शेतातील ५ एकरावरील आंब्यांच्या झाडाचे ४ टन आंबे खाली पडले आहेत, यात ४ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे तर डाळिंबाचे ५ लाखांपेक्षा जास्त, १ एकर क्षेत्रावरील दोडक्याचे ५ ते ६ लाखांचे तर १ एकरवरील २२ लाख रुपयांच्या नवीन केलेल्या पाॅलिहाऊसमध्ये लावलेल्या लाल, पिवळ्या मिरचीचे नुकसान झाले आहे. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या बागा व लाखो रुपये खर्च केल्यानंतर ऐन तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. सरकारने तत्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी.

- कैलास आंधळे, प्रगतशील शेतकरी, आंधळेवाडी

===Photopath===

110421\img-20210411-wa0385_14.jpg~110421\img-20210411-wa0376_14.jpg

===Caption===

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंब्यांच्या झाडांना लगडलेल्या कैऱ्यांचा सडा पडला तर पॉली हाऊसचे नुकसान झाले.