शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST

बीड : शहरातील शाहूनगर, सहयोगनगर, मोंढा रोड, माळीवेस, अंबिका चौक, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, ...

बीड : शहरातील शाहूनगर, सहयोगनगर, मोंढा रोड, माळीवेस, अंबिका चौक, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, कचराही ठिकठिकाणी साचलेला असतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, पालिकेने विशेष मोहीम राबवत स्वच्छता करण्याची मागणी आहे.

रस्त्याची दुरवस्था

बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता, मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.

विजेचा लपंडाव सुरूच

पाटोदा : तालुका आणि परिसरात सध्या वीजपुरवठा नेहमीच खंडित होत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संताप दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. याकडे महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक

बीड : बीड ते गेवराई, वडवणी, मांजरसुंबा, पाटोदा मार्गावर खासगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. वाहतूक शाखा पोलीस व आरटीओ कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर कारवाईची मागणी होत आहे.

गेवराई स्थानकासमोर नो पार्किंगचा बोजवारा

गेवराई : येथील बसस्थानकासमोर नो पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होतो. तसेच नागरिक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ नो पार्किंगची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

खासगी वाहतूक

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव आणि परिसरात खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या ग्रामीण प्रवाशांकडून जादा भाडे घेतल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

तालखेड : काही दिवसांपूर्वी बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होते. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

गुरांना उपचार मिळेनात

चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात, मात्र त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अनेक वेळा उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. अनेकदा पशुपालकांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.