शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील ...

बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील यादव अंबादास दुसगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू

बीड : शहरात वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची तपासणी केली जात असून, शहर ठाण्यांतर्गत वर्षभरात १,१६३ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापोटी २ लाख ६५ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सीट बेल्ट, ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह, कागदपत्रांची तपासणी यासह इतर वाहनांच्या नियमावलीचा समावेश आहे. शुक्रवारी पोलीस शिपाई ए.ए. सय्यद, भागवत घोडके यांनी वाहन तपासणी मोहीम सुरूच ठेवली.

जुन्या वादावरून मारहाण

परळी : शहरातील बरकतनगर येथील नाझिया हबीब पठाण यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शेख रफिक शेख रज्जाक, शेख तब्बो शेख रफिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोना. देशमुख तपास करीत आहेत.

डोंगर जाळण्याचे प्रकार

बीड : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डोंगररागांवर आग लावण्याचे प्रकार मागील काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळे गवत चांगले येते, अशी गैरसमजूत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.

डासांची उत्पत्ती वाढली

वडवणी : शहरातील गटारींची स्वच्छता मागील काही महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. उघड्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून, डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वडवणीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

कापसाची वेचणी सुरूच

बीड : कापूस पिकाच्या दोन वेचण्यांमध्ये उत्पादन निघाले. दरम्यान, फरदड कापसाची वेचणी करण्यावरदेखील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दरम्यान, बोंडअळीसारखा प्रकार वाढू नये म्हणून फरदड घेण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

क्रीडांगणाची दुरवस्था

बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी काही ठिकाणची दुरवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, तात्काळ सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.