शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील ...

बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील यादव अंबादास दुसगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू

बीड : शहरात वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची तपासणी केली जात असून, शहर ठाण्यांतर्गत वर्षभरात १,१६३ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापोटी २ लाख ६५ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सीट बेल्ट, ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह, कागदपत्रांची तपासणी यासह इतर वाहनांच्या नियमावलीचा समावेश आहे. शुक्रवारी पोलीस शिपाई ए.ए. सय्यद, भागवत घोडके यांनी वाहन तपासणी मोहीम सुरूच ठेवली.

जुन्या वादावरून मारहाण

परळी : शहरातील बरकतनगर येथील नाझिया हबीब पठाण यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शेख रफिक शेख रज्जाक, शेख तब्बो शेख रफिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोना. देशमुख तपास करीत आहेत.

डोंगर जाळण्याचे प्रकार

बीड : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डोंगररागांवर आग लावण्याचे प्रकार मागील काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळे गवत चांगले येते, अशी गैरसमजूत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.

डासांची उत्पत्ती वाढली

वडवणी : शहरातील गटारींची स्वच्छता मागील काही महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. उघड्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून, डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वडवणीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

कापसाची वेचणी सुरूच

बीड : कापूस पिकाच्या दोन वेचण्यांमध्ये उत्पादन निघाले. दरम्यान, फरदड कापसाची वेचणी करण्यावरदेखील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दरम्यान, बोंडअळीसारखा प्रकार वाढू नये म्हणून फरदड घेण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

क्रीडांगणाची दुरवस्था

बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी काही ठिकाणची दुरवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, तात्काळ सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.