शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परळी थर्मलचे दोन संच बंद; ५०० मेगावॅट विजेची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 17:53 IST

नवीन परळी औष्णिक केंद्रात 250 मेगावॅट क्षमतेचे  तीन संच

ठळक मुद्देतीन संचाची स्थापित क्षमता  750 मेगावॉट एवढी आहे. संच क्र. 6 व 7 हे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत.

- संजय खाकरे

परळी : तालुक्यातील दाऊतपुर येथील नविन परळी औष्णिक विद्युत केंद्र (थर्मल ) मध्ये 250 मे.वॅ. क्षमतेचे प्रत्येकी संच क्र. 6,7 व 8 हे तीन संच  आहेत, एम.ओ.डी. रेट मध्ये बसत नसल्याच्या कारणावरून 250 मे.वॅ. क्षमतेचे संच क्र. 6 व 7 हे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी संच क्र. 8 हा एकमेव संच चालू होता या संचातून 13 मार्च रोजी दुपारी 1 च्या दरम्यान 250 मे.वॅ. एवढी विज निर्मिती चालू होती. 

येथील नवीन परळी औष्णिक केंद्रात 250 मेगावॅट क्षमतेचे  तीन संच असून या तीन संचाची  स्थापित क्षमता  750 मेगावॉट एवढी आहे. नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.6 हा 12 मार्च रोजी तर संच क्र. 7 हा 9 मार्च रोजी बंद ठेवण्यात आला. शुक्रवारी केवळ संच क्र. 8 हाच चालू होता. नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 3 संचापैकी 2 संच बंद ठेवण्यात आल्याने 500 मे.वॅ.विजेची तुट जाणवली. महाजनकोच्या आदेशानुसार हे दोन संच नविन परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासनाने बंद ठेवले आहेत. मिरीट ऑर्डर डिस्पॅच रेट मध्ये बसत नसल्यामुळे परळीचे दोन संच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेंव्हा विजेची मागणी वाढेल तेंव्हा हे दोन संच सुरू करण्यात येणार असल्याचे येथील स्थानिक अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 

परळीला वीजनिर्मितीसाठी खाणीतून दगडी कोळसा आणण्यासाठी ज्यादा अंतर लागत आहे त्यामुळे येथील विजेच्या खर्चाचा दर वाढत आहे. हे लक्षात घेवून संच बंदचा निर्णय लागू केले जात आहे. यातून एम.ओ.डी. रेटच्या निकषातून परळी औष्णिक विद्युत केंद्राला वगळावे व संच बंद ठेवण्यात येवू नये अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांनी या पूर्वी  ऊर्जा विभागा कडे केली आहे. संच बंदच्या निर्णयामुळे महाजनकोचे मोठे नुकसान होत आहे व परळीच्या बाजारपेठेवरही परिणाम होत आहे असे मतही चेतन सौंदळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :electricityवीजBeedबीड