शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जावयाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आजोबाची फिर्याद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:55 IST

नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे.

बीड : नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे. गेवराई तालुक्यातील खामगाव येथे ही घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अत्याचाराच्या प्रयत्नात असणा-या जावयाला गेवराई पोलिसांनी रात्री खामगाव परिसरातीलच उभ्या उसातून बेड्या ठोकल्या. चिमुकली सुरक्षित घरी परतल्याने कुटुंबीयांच्या चेह-यावर हास्य फुलले होते. असे असले तरी नात्याला काळिमा फासणा-या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.वर्षा (नाव बदललेले) ही आई-वडील उसतोडणीसाठी गेल्याने आपल्या आजोबाजवळ वास्तव्यास होती. नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली. याचवेळी नात्याने मामा असलेला (आत्याचा पती) हिराजी मोतीराम फुलवारे (रा.मुरूम ता.घनसावंगी जि.जालना) हा शाळेत आला. शिक्षकांशी खोटे बोलून वर्षाला तुला नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे सांगून शाळेतून घेऊन गेला. खामगाव परिसरात पाण्याची सोय असल्याने सर्वत्र उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. याच उसात तो वर्षाला घेऊन गेला. इकडे नातेवाईक वर्षाचा सर्वत्र शोध घेत होते, परंतु ती मिळाली नाही. त्यांनी गेवराई पोलीस ठाणे गाठले आणि कैफियत मांडली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्वता: तपासासाठी बाहेर पडले. चौकशी केली असता हिराजी वर्षाला घेऊन गेल्याचे समजले. हिराजी हा दारुड्या असल्याने नातेवाईकांना चिंता होती. आपल्या चिमुकलीसोबत काही अनर्थ तर होणार नाही, या काळजीने ते घायाळ झाले होते.दुस-या बाजूला नात्याने मामा असणा-याच हिराजीने वर्षाला पळवून नेल्याने आणि तिचे वय अवघे सहा वर्ष असल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान आहेर यांच्यासमोर होते. सुरुवातीला त्यांनी गावात चौकशी केली. त्यानंतर एका खब-यामार्फत त्यांना वर्षाला उसात नेल्याचे समजले. पोलीसही घाबरले. दूरवर सर्वत्र उसच दिसत असल्याने त्यांना सापडणे मुश्कील पण अशक्य नव्हते. त्यातच तो चिमुकलीस काही करणार तर नाही ना? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.आहेर यांनी तत्काळ पोलिसांची फौज मागविली. नातेवाईकांनाही सोबत घेतले, परंतु यश आले नाही. रात्री सात वाजेच्या सुमारास आहेर यांना एका कोप-यात ऊस हलल्याचे दिसले. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता हिराजीने वर्षाला डांबून ठेवल्याचे दिसले. त्यांनी चतुराईने हिराजीच्या तावडीतून वर्षाची सुटका केली. अवघ्या दहा तासात तपास लावल्याने गेवराई पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या टिमने केली.अन् वर्षा धायमोेकलून रडली...दिनेश आहेर यांनी वर्षाला सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन केले. आपले कुटुंबीय दिसताच वर्षाने आजीकडे धाव घेतली आणि तिच्या कुशीत जाऊन धायमोकलून रडू लागली. यावेळी इतर नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले. वर्षा परत आल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता.पोलिसांची यशस्वी कामगिरीदिवसभर शोधल्यानंतरही वर्षा आणि हिराजी मिळत नव्हते. सापडावे तर कोठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. परंतु पोलिसांनी माघार घेतली नाही. अंधार पडेपर्यंत हिराजीचा शोध घेतला. यामध्ये त्यांना यश आले. पोलिसांचा आवाज शांत झाल्याचे समजताच हिराजी बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ही पोलिसांची ह्यचालह्ण होती, हे त्याला बेड्या ठोकल्यावर समजले.