शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

‘यातना उत्सव’मधून आम्ही सम्यक क्रांतीचे स्वप्न बघितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST

गेवराई : प्रजासत्ताक भारताच्या राज्यघटनेने सर्व समाजाला समान पातळीवर आणलेले आहे, हेच सम्यक क्रांतीचे स्वप्न आम्ही ‘यातना उत्सव’ या ...

गेवराई : प्रजासत्ताक भारताच्या राज्यघटनेने सर्व समाजाला समान पातळीवर आणलेले आहे, हेच सम्यक क्रांतीचे स्वप्न आम्ही ‘यातना उत्सव’ या नाटकामधून बघितल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार प्रा. बापू घोक्षे यांनी केले. येथील महिला महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’च्या अंतिम दिवशी ‘माझी नाट्य लेखनप्रक्रिया’ या विषयावर प्रा. बापू घोक्षे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातील असलेल्या ‘यातना उत्सव’ या नाटकाची लेखनप्रक्रिया प्रा. बापू घोक्षे यांनी मांडली. अनुभवकथनासोबतच दलित साहित्य आणि समाजाच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केले. आपले अनुभवकथन करताना ते म्हणाले, समाजाच्या वर्णसत्ताधारित किंवा धर्मसत्ताधिष्ठित विषमतावादी संस्कृतीला महान कसे म्हणता येईल? मानवाचे निसर्गदत्त माणूसपण नाकारणारी संस्कृती एकसंध मानवतावाद कसा उभा करू शकेल, असे प्रश्न उभे करीत त्यांनी संस्कृतीचा गतिमान रथ आता क्रांतीच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात जाळल्या गेलेल्या एका दलित वस्तीचे भग्नावशेष बघून मला ‘यातना उत्सव’ ही नाट्यकृती लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचेही प्रा. बापू घोक्षे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविकात प्रा. नामदेव शिनगारे यांनी दलित रंगभूमी-साहित्याचा आढावा घेत प्रा. बापू घोक्षे यांच्या समग्र साहित्याची चर्चा केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ संजय भेदेकर यांनी केले. प्रा. डॉ प्रवीण शिलेदार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ प्रवीण शिलेदार, प्रा. रामहरी काकडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्राध्यापक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.