शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

५०व्या वर्षी जन्मले तिळे ; लग्नानंतर २५ वर्षांनी हलला पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:38 IST

लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर घरात पाळणा हलला. एक मुलगा आणि दोन मुली असे तिळे जन्माला आल्याने ५० वर्षे वयाच्या हरिभाऊंना आकाश ठेंगणे झाले.

बीड : लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर घरात पाळणा हलला. एक मुलगा आणि दोन मुली असे तिळे जन्माला आल्याने ५० वर्षे वयाच्या हरिभाऊंना आकाश ठेंगणे झाले.

परळी तालुक्यातील कौठाळी येथील शेतकरी हरिभाऊ यादव घुले यांचे २५ वर्षांपूर्वी लग्न झाले. हरीभाऊंना आणि कुटुंबियांना अपत्य प्राप्तीचे वेध लागले. महिने सरले, वर्षे सरली तरी अपत्याचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते. नवसाचा एकही देव सोडला नाही की कुठला डॉक्टर सोडला नाही, परंतु पदरी निराशाच येत गेली. त्यामुळे पत्नी शकुंतलाबाई यांनी मनाचा मोठेपणा आणि समजूतदारपणा दाखवत हरिभाऊंना दुसऱ्या लग्नासाठी तयार केले.

१० वषार्पूर्वी हरिभाऊंचे दुसरे लग्न औरंगपूर येथील गंगाबाई यांच्याशी झाले. तरी दुर्भाग्याने पिच्छा सोडला नाही. पुन्हा देवाला साकडे, नवसपूर्ती आणि दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या. अखेर गंगाबाई गर्भवती राहिल्या. चाचणीदरम्यान त्यांच्या पोटात तिळे असल्याची कल्पना डॉक्टरांना आली होती. मग त्यांनी हरिभाऊंना अधिक काळजी घेण्याचे सांगून मार्गदर्शन केले. अल्पशिक्षित आणि ग्रामीण असूनही हरिभाऊंनी व त्यांच्या पहिल्या पत्नी शकुंतलाबाई यांनी गंगाबाई यांची काळजी घेतली.

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचे प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रसूतीच्या संभाव्य तारखेच्या एक महिना आधी गंगाबार्इंना रुग्णालयात दाखल केले. ६ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास गंगूबार्इंनी एक मुलगा आणि दोन मुलीस जन्म दिला आणि हरीभाऊंची २५ वर्षांपासूनची अपत्यप्राप्तीची प्रतीक्षा संपली. वयाच्या ५० व्या वर्षी हरिभाऊ एकदाच तीन-तीन लेकरांचे बाप झाले. दहा दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर गंगाबाई आणि तिन्ही बाळांना सुट्टी देण्यात आली. सध्या हे सर्वजण गंगाबार्इंच्या माहेरी औरंगपुर येथे आहेत.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलMarathwadaमराठवाडा