शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५०व्या वर्षी जन्मले तिळे ; लग्नानंतर २५ वर्षांनी हलला पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:38 IST

लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर घरात पाळणा हलला. एक मुलगा आणि दोन मुली असे तिळे जन्माला आल्याने ५० वर्षे वयाच्या हरिभाऊंना आकाश ठेंगणे झाले.

बीड : लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर घरात पाळणा हलला. एक मुलगा आणि दोन मुली असे तिळे जन्माला आल्याने ५० वर्षे वयाच्या हरिभाऊंना आकाश ठेंगणे झाले.

परळी तालुक्यातील कौठाळी येथील शेतकरी हरिभाऊ यादव घुले यांचे २५ वर्षांपूर्वी लग्न झाले. हरीभाऊंना आणि कुटुंबियांना अपत्य प्राप्तीचे वेध लागले. महिने सरले, वर्षे सरली तरी अपत्याचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते. नवसाचा एकही देव सोडला नाही की कुठला डॉक्टर सोडला नाही, परंतु पदरी निराशाच येत गेली. त्यामुळे पत्नी शकुंतलाबाई यांनी मनाचा मोठेपणा आणि समजूतदारपणा दाखवत हरिभाऊंना दुसऱ्या लग्नासाठी तयार केले.

१० वषार्पूर्वी हरिभाऊंचे दुसरे लग्न औरंगपूर येथील गंगाबाई यांच्याशी झाले. तरी दुर्भाग्याने पिच्छा सोडला नाही. पुन्हा देवाला साकडे, नवसपूर्ती आणि दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या. अखेर गंगाबाई गर्भवती राहिल्या. चाचणीदरम्यान त्यांच्या पोटात तिळे असल्याची कल्पना डॉक्टरांना आली होती. मग त्यांनी हरिभाऊंना अधिक काळजी घेण्याचे सांगून मार्गदर्शन केले. अल्पशिक्षित आणि ग्रामीण असूनही हरिभाऊंनी व त्यांच्या पहिल्या पत्नी शकुंतलाबाई यांनी गंगाबाई यांची काळजी घेतली.

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचे प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रसूतीच्या संभाव्य तारखेच्या एक महिना आधी गंगाबार्इंना रुग्णालयात दाखल केले. ६ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास गंगूबार्इंनी एक मुलगा आणि दोन मुलीस जन्म दिला आणि हरीभाऊंची २५ वर्षांपासूनची अपत्यप्राप्तीची प्रतीक्षा संपली. वयाच्या ५० व्या वर्षी हरिभाऊ एकदाच तीन-तीन लेकरांचे बाप झाले. दहा दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर गंगाबाई आणि तिन्ही बाळांना सुट्टी देण्यात आली. सध्या हे सर्वजण गंगाबार्इंच्या माहेरी औरंगपुर येथे आहेत.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलMarathwadaमराठवाडा