शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:59 IST

तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.

माजलगाव (बीड ) : तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर उताऱ्यात जय महेश कारखाना आघाडीवर असून परिसरात अद्यापही २५ टक्के शेतकऱ्यांचा ऊस फडातच उभा आहे. 

सतत चार वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून पावसाने मोठा दिलासा दिला आहे. समाधानकारक झालेल्या पावसाने पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरले. दोन्ही धरणाचे कालवे, माजलगाव धरणाचे बँकवाटर, गोदावरी, सिंदफणा नदीवरील उच्चपातळी बंधारे, उर्ध्वकुंडलीका प्रकल्प यातील मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा ऊस उत्पादनासाठी पुढे सरसावला असून मोठ्याप्रमाणात ऊस लागवड झाली आहे.

माजलगाव परिसरातील ऊस गाळप करण्यासाठी तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके, सावरगाव येथील छत्रपती तर, पवारवाडी येथील जय महेश हे तीन साखर कारखाने यावर्षी पूर्णक्षमतेने सुरु आहेत. शुक्रवार (ता. २४) पर्यंत वरील तिन्ही कारखान्याने एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. वरील तिन्ही कारखान्यापैकी जय महेशचा साखर उतारा सर्वाधिक (१०.०३) असून शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल वेळेवर देण्यात छत्रपती कारखाना आघाडीवर आहे. 

तीन कारखान्याचे गाळप :

कारखान्याचे नाव        -   ऊस गाळप   - साखर उत्पादन  -  सरासरी उतारा

सुंदरराव सोळंके कारखाना - ५,४९,५०० मे.ट. - ५,१४,६५० क्विंटल - ९.४६ टक्केजय महेश कारखाना -     ६,८५,६३५ मे.ट. - ६,७७,८०० क्विंटल – १०.०३ टक्के छत्रपती कारखाना     -   २,२०,४११ मे.ट. – २,१५,००० क्विंटल – ९.९० टक्के

गेटकेनमुळे कार्यक्षेत्रातील ऊस फडातच वरील तिन्ही कारखानदारांनी गाळप हंगामाच्या सुरुवातीला गेटकेनचा (बाहेरचा) ऊस आणण्यावर भर दिला. दोन महिने सर्वाधिक तोडणी यंत्रणा बाहेर असल्याने कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही फडातच उभा आहे. गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसाचे पाणी तोडल्याने वजनात घट होत असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBeedबीड