शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:59 IST

तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.

माजलगाव (बीड ) : तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर उताऱ्यात जय महेश कारखाना आघाडीवर असून परिसरात अद्यापही २५ टक्के शेतकऱ्यांचा ऊस फडातच उभा आहे. 

सतत चार वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून पावसाने मोठा दिलासा दिला आहे. समाधानकारक झालेल्या पावसाने पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरले. दोन्ही धरणाचे कालवे, माजलगाव धरणाचे बँकवाटर, गोदावरी, सिंदफणा नदीवरील उच्चपातळी बंधारे, उर्ध्वकुंडलीका प्रकल्प यातील मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा ऊस उत्पादनासाठी पुढे सरसावला असून मोठ्याप्रमाणात ऊस लागवड झाली आहे.

माजलगाव परिसरातील ऊस गाळप करण्यासाठी तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके, सावरगाव येथील छत्रपती तर, पवारवाडी येथील जय महेश हे तीन साखर कारखाने यावर्षी पूर्णक्षमतेने सुरु आहेत. शुक्रवार (ता. २४) पर्यंत वरील तिन्ही कारखान्याने एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. वरील तिन्ही कारखान्यापैकी जय महेशचा साखर उतारा सर्वाधिक (१०.०३) असून शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल वेळेवर देण्यात छत्रपती कारखाना आघाडीवर आहे. 

तीन कारखान्याचे गाळप :

कारखान्याचे नाव        -   ऊस गाळप   - साखर उत्पादन  -  सरासरी उतारा

सुंदरराव सोळंके कारखाना - ५,४९,५०० मे.ट. - ५,१४,६५० क्विंटल - ९.४६ टक्केजय महेश कारखाना -     ६,८५,६३५ मे.ट. - ६,७७,८०० क्विंटल – १०.०३ टक्के छत्रपती कारखाना     -   २,२०,४११ मे.ट. – २,१५,००० क्विंटल – ९.९० टक्के

गेटकेनमुळे कार्यक्षेत्रातील ऊस फडातच वरील तिन्ही कारखानदारांनी गाळप हंगामाच्या सुरुवातीला गेटकेनचा (बाहेरचा) ऊस आणण्यावर भर दिला. दोन महिने सर्वाधिक तोडणी यंत्रणा बाहेर असल्याने कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही फडातच उभा आहे. गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसाचे पाणी तोडल्याने वजनात घट होत असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBeedबीड