शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

बीडकरांना होणार तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:51 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

ठळक मुद्देनगराध्यक्षांची माहिती : बिंदुसरा आणि माजलगाव धरणात पाणीसाठा वाढला

बीड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांकडून पाणी साठ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी या सूचना दिल्या.चालू वर्षाच्या पावसाळ्यात सुरु वातीला कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. बीड शहराला आठ दिवसाआड तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. परंतु परतीच्या पावसाने बिंदुसरा धरणात ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. माजलगाव धरणात जवळपास ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अमृत अटल योजनेच्या माध्यमातून शहरासाठी ११ जलकुंभाचे काम जलदगतिने सुरू असून त्यापैकी पाच जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. यातील तीन जलकुंभातून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी दिली. अमृत अटल योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी