शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

बीडकरांना होणार तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:51 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

ठळक मुद्देनगराध्यक्षांची माहिती : बिंदुसरा आणि माजलगाव धरणात पाणीसाठा वाढला

बीड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांकडून पाणी साठ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी या सूचना दिल्या.चालू वर्षाच्या पावसाळ्यात सुरु वातीला कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. बीड शहराला आठ दिवसाआड तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. परंतु परतीच्या पावसाने बिंदुसरा धरणात ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. माजलगाव धरणात जवळपास ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अमृत अटल योजनेच्या माध्यमातून शहरासाठी ११ जलकुंभाचे काम जलदगतिने सुरू असून त्यापैकी पाच जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. यातील तीन जलकुंभातून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी दिली. अमृत अटल योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी