शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुर्दैवी! विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू; हसतंखेळतं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 21:45 IST

अंबाजोगाई तालुक्यातील बागझरीतील धारासुरे कुटुंबावर काळाचा घाला 

अंबेजोगाई - तालुक्यातील बागझरी गावात राहणार्‍या धारासुरे कुटुंबावर शनिवारी सकाळी काळ धावून आला. अंड्याची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन आई, दोन मुलींसह आठ महिन्याचा मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाग्यश्री काशिनाथ धारासुरे (वय २८), साधना काशिनाथ धारासुरे  (वय ०६), श्रावणी काशिनाथ धारासुरे  (वय ०४) आणि नारायण काशीनाथ धारासुरे (८ महिने) अशी विषबाधेने मृत्यू झालेल्या आई आणि चिमुकल्यांची नावे आहेत. बागझरी येथील काशिनाथ दत्तू धारासुरे (वय ३१) हे शेतकरी आहेत. शुक्रवारी (दि.२५) रात्री त्यांची पत्नी भाग्यश्रीआणि मुलांनी अंड्याची भाजी खाल्ली. या जेवणातून त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास पत्नी आणि मुलांना विषबाधा झाल्याची शंका काशिनाथ यांना आली. त्यांनी तातडीने चौघांना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले. यावेळी उपचार सुरु असताना साधना आणि श्रावणी यांचा आधी मृत्यू झाला. चिमुकल्या नारायणने त्यानंतर तासाभराने प्राण सोडले. तर रात्री ९ भाग्यश्री यांचाही  मृत्यू झाला. या घटनेने धारासुरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सायंकाळी झाले अंत्यसंस्कारतिन्ही मयत चिमुकल्यांचे शनिवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बागझरी येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बर्दापूर पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.