शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये वॉटरकप स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:10 IST

वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

ठळक मुद्देइंधन खर्चासाठी प्रत्येक सहभागी गावासाठी १.५० लाख रुपयांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. आमिर खान यांच्या संकल्पनेतून राज्यात वॉटरकप स्पर्धा राबवली जात आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना बक्षीस देखील दिले जाते. आपला शिवार पाणीदार करण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात अनेक गावांनी या स्पर्धेच्या माध्यमातून परिवर्तनाची वाट धरली. श्रमदानानंतर यंत्राने कामे करावी लागणार आहेत. या यंत्रांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या खर्चाचा विषय होता. जैन संघटना तसेच इतर सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी इंधनासाठी आर्थिक मदत केली. आता या कामांना गती मिळण्यासाठी प्रशासन देखील सरसावले आहे.

राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा झाल्यानंतर वॉटर कप स्पर्धेतील गावांना यंत्रकामासाठी इंधन खर्च पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक सहभागी गावाला दीड लाख रुपये मिळणार आहेत. हा निधी तातडीने दिल्यास स्पर्धेतील गावांचा वेळ वाया जाणार नाही. प्रशासनाने या दृष्टीने तातडीने निधी वितरणासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी होत आहे.तीन कोटींची तरतूदजिल्ह्यात उन्हाळ््यात देखील फक्त ८ ते १० टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात २९० गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेत सहभागी झाले आहे. त्यापैकी १०३ गावांनी मृदा व जलसंधारणासाठी प्रत्यक्ष श्रमदान केले आहे. या गावांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मशीनद्वारे केल्या जाणाºया कामांना लागणारे इंधन खर्चासाठी प्रत्येकी १.५० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. वॉटरकप स्पर्धेतील केज, अंबाजोगाई, परळी, धारूर, आष्टी या तालुक्यातील धरणातील गाळ काढण्यासठी देखील निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी रूपये निधीची तरतूद केली आहे. आता या वॉटरकपच्या कामांना आणखी गती मिळणार असून, सहभागी गावातील स्पर्धकांचा उत्साह वाढणार आहे. या झालेल्या कामांमुळे जिल्हा पाणीदार होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :BeedबीडWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाMarathwadaमराठवाडा