शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बीड जिल्ह्यात एकही अनधिकृत शाळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST

बीड : शिक्षणाचा हक्क कायद्यामुळे शासन व शिक्षण विभागाच्या नियंत्रणामुळे जिल्ह्यात मागील चार वर्षांत एकही शाळा अनधिकृत नसून शासनामार्फत ...

बीड : शिक्षणाचा हक्क कायद्यामुळे शासन व शिक्षण विभागाच्या नियंत्रणामुळे जिल्ह्यात मागील चार वर्षांत एकही शाळा अनधिकृत नसून शासनामार्फत परवानगी असलेल्या शाळांमधून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सामाजिक संस्थांच्या नावावर शाळा सुरू करण्याचे पेव फुटले होते. काहींचा प्रामाणिक हेतू, तर काहींनी या माध्यमातून दुकानदारी थाटली. यातच अनधिकृत आणि बोगस शाळांमुळे तेथे काम करणारे शिक्षक व कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळत होता, तर अनेकदा संस्थाचालक आणि त्यांच्यात वाद होऊन कोर्टकचेरीच्या भानगडीत नुकसानही सहन करावे लागते. दुसरीकडे परीक्षा आणि शाळेतील अंतिम वर्ग संपल्यानंतर पुढच्या शिक्षणात होणारी अडचण पाल्यांच्या दृष्टीने धोक्याची ठरते, त्यामुळे पालकांचेही नुकसान होते. फोफावलेल्या दुकानदारीला लगाम घालण्याचे प्रयत्न झाले. अखेर आरटीई लागू झाल्यानंतर अनधिकृत शाळांवर कडक निर्बंध आले. शासकीय तिजोरीवरचा भार वाढत असल्याने अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना मंजुरी थांबविण्यात आली, तर अशा ज्या शाळा अस्तित्वात आहेत. त्यांचे अनेक प्रश्न आजही शासन दरबारी आहेत. त्यामुळे स्वयंअर्थसाहाय्यित शाळांना परवानगी देण्याचे धोरण पुढे अमलात आले. स्वबळावर चालणाऱ्या शाळांना निकषांची पूर्तता केल्यास परवानगी दिली जात असल्याने शाळा अनधिकृत राहण्याचे प्रमाण नसल्यासारखेच आहे.

----

जिल्ह्यात पाचवी ते बारावीच्या ७६० पैकी ५६ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. ४०६ शाळा, १०२ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के अनुदानित आहेत. ८० शाळा अंशत: अनुदानित (२० टक्के) आहेत, तर ११८ शाळा या स्वयंअर्थसाहाय्यित आहेत. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकही अनधिकृत माध्यमिक शाळा निदर्शनास आली नाही. मागील चार वर्षांत एकही प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे दिसून आले नाही. उर्दू व मराठी माध्यमाच्या १४८ शाळा स्वयंअर्थसाहाय्यित आहेत.

---------

निकष पूर्ण केले तरच शाळांना मंजुरी

जमीन, ५ लाख रुपये अनामत, ३० हजार रुपयांचे चालान, इतर शाळांपासूनचे अंतर, पटसंख्या, भौतिक सुविधा,

आर्थिक पात्रता आदी निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना स्वयंअर्थसाहाय्यित शाळा सुरू करण्यास परवानगी मिळते. या शाळांना आरटीईचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

--------

एकही तक्रार नाही

शासन आणि उपसंचालकांमार्फत येणाऱ्या शाळा प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात अनधिकृत शाळा असल्याचे निदर्शनास आलेले नाही, तसेच तक्रारीही आलेल्या नाहीत. अशा बाबतीत शिक्षण विभाग सजग आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.

--------